पुणे : चारचाकी गाडीतून नारायणपूर येथे देव दर्शनासाठी निघालेल्या MIT च्या विद्यार्थ्यांच्या चारचाकी गाडीचा झालेल्या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे, तर पाच जण गंभीर जखमी आले आहेत. हि घटना सासवड – कापूरहोळ रस्त्यावर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हा अपघात एवढा भिषण होता कि यामध्ये गाडीचा जागेवरच चक्काचूर झाला होता.
रचित मोहता (वय-१८, रा. कलकत्ता, पश्चिम बंगाल), गौरव लालवानी (वय-१९, रा रायपूर, छत्तिसगढ़) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर इतर पाच जणांना पुढील उपचारसाठी पुण्यातील ससुन रूग्णायल येथे दाखल करण्यात आले आहे. चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडीने चार पलटी खात हा अपघात झाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या अपघातात तीन मुलींचाहि समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झालेले सर्व विद्यार्थी हे वेगवेगळ्या राज्यातून असून पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असेलेली चारचाकी गाडी हि तेथीलच मेघ मल्हार टि हाउस व शिवलक्ष्मी दुकानाला धडक देवून उलटी झाली. यावेळी नारायणपूरचे स्थानिक नागरीक भानुदास बोरकर, रामभाउ बोरकर, सचिन झेंडे, भरत क्षिरसागर यांनी तात्काळ जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून सासवड ग्रामीण रूग्णालय येथे उपचारकामी दाखल केले.
उपचारादरम्यान रचित मोहता व गौरव लालवानी यांना डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाल्यचे घोषित केले. तर इतर पाच जणांना पुढील उपचारसाठी ससुन रूग्णालयात पाठविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच सासवड पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे.
दरम्यान, सासवड पोलिसांकडून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असून पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के हे पुढील तपास करीत आहेत.