नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाने आपल्या सख्ख्या आईचा जीव घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आईच्या हत्येनंतर मुलाने स्वतः पोलिसांना या हत्येबाबत माहिती दिली आणि याच कारणही सांगितलं. नराधम मुलाने आईच्या हत्येचे कारण सांगितल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. ही नेमकी घटना काय आहे? जाणून घेऊया…

नाशिकमधील शिवाजीनगर परिसरात राहणार अरविंद मुरलीधर पाटील याने आपली आई यशोदाबाई पाटील (वय वर्ष ८०) यांची हत्या केली. मुलाने आईचा गळा दाबून खून केला नंतर पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर गुन्हा कबूल करत ‘कंटाळा आला होता, म्हणून मी माझ्या आईचा गळा दाबून खून केला. अशी कबुली दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आणि यशोदाबाई यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. नंतर मुलावर खुनाचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद पाटील हा मानसिक रूग्ण असून, त्याचे लग्न देखील झाले होते. पण त्याच्या बिघडलेल्या मानसिक स्थितीमुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती.







