Agriculture Department: महाराष्ट्र राज्यातील कृषी विभागाला आत नवी ओळख प्राप्त होणार आहे. शासन निर्णयानुसार सन 1881 च्या फेमीन कमिशनच्या शिपारसीनुसार निर्माण झालेल्या या विभागाचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय तब्बल 38 वर्षानंतर घेण्यात असून कृषी विभागासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात अनेक बदल झाले याच पार्श्वभूमीवर नवा काळ, नवी दृष्टी आणि नवी ओळख समोर येणार आहे. यानुषंगाने कृषी विभागाने आपले नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्य तयार केले आहे.

राज्यात 1883 साली कृषी विभागाची स्थापना झाली त्यानंतर मे 1987 च्या शेतकरी मासिकाच्या अंकात प्रथमच कृषी विभागाने आपले पहिले बोधचिन्ह आणि घोषवाक्य सादर केले होते. मागील 38 वर्षांपासून कृषी विभागाने शासकिय कार्यक्रमांत ते परिषदांपर्यंत जुने बोधचिन्ह आणि घोषवाक्य वापरले. पंरतू बदलत्या गरजांनुसार आणि कालबाह्यतेमुळे कृषी विभागाला नवी ओळख निर्माण व्हावी याकरिता शासनाने बोधचिन्ह आणि घोषवाक्य बदल्याचा निर्णय घेतला.
नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य काय आहेत?
नवे युगातील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी, या दृष्टीकोनातून बोधचिन्ह आणि घोषवाक्याची निर्मीती करण्यात आली. ‘कृषी कल्याण कर्तव्यम्’ ही ओळ बोधचिन्हात दिसून येईल तर नवीन घोषवाक्य ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ असे असेल. जुने बोधचिन्ह आणि घोषवाक्य कालबाह्य ठरू लागल्याने राज्य सरकारने या नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्य वापरण्यास अटी दिल्या आहेत.
शासनाच्या ‘या’ अटी लक्ष्यात ठेवा!
या निर्णयानंतर, कोणत्याही व्यक्तीने अनधीकृतपणे जूने बोधचिन्ह आणि घोषवाक्य यांचा गैरवापर करून नये. वापरल्यास सदर व्यक्तीवर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार.
‘मानत्याप्राप्त बोधचिन्ह आणि घोषवाक्य ही शासकिय कामात, प्रसारमाध्यमे, कृषी प्रदर्शनं, शेतकरी मेळावे आणि अधिकृत कार्यक्रमांमध्ये हे चिन्ह ठळकपणे दिसावे.






