सोमाटणे(पुणे): गेल्या काही वर्षात फोन आणि इंटरनेट यांचा माणसाच्या मुलभूत गरजांमध्ये समावेश करावा लागतो की काय अशी भीती वाटू लागली आहे. मागील काही वर्षंपासून लग्नात निमंत्रण पत्रिका घरी जावून देणे ही परंपरा जणू कालवश होते की काय अशी भीती वाटू लागली आहे. पूर्वी घरातील लग्न सोहळा म्हणजे प्रत्येक सदस्य कमालीचा व्यस्त असायचा आता लग्नात केले जाणारे प्रत्येक काम हे पैसे देवून होऊ लागले आहे. त्यामुळे जो आपले पणा पूर्वी लग्न सोहळ्यांमध्ये होता तो कमी होतोय का ? अशी भीती सामाजिक तज्ञ व्यक्त करता आहेत.
लग्न मुहूर्त ठरल्यानंतर सर्वांत आधी कुलदेवते समोर निमंत्रण पत्रिका ठेवून मगच इतरांना निमंत्रण पत्रिका देण्यास सुरुवात व्हायची. व्हाट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी माध्यमांवरून पत्रिका पाठवली जात आहे. सध्या जगाची आधुनिकतेशी नाळ जुळल्यामुळे डिजिटल स्वरुपात लग्नपत्रिकांचा आजघडीला मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे.लग्नपत्रिका वाटप करण्यामागचा उद्देश म्हणजे फक्त निमंत्रण देणे नव्हते तर सर्वांची ख्याली खुशाली कळायची. आता ती जबाबदारी फोन मधल्या संदेस नामक प्रोग्रामने घेतली आहे.
परंपरा कालबाह्य होतेय
पत्रिका वाटप करण्याला अनेक वर्षाचा इतिहास आहे .पूर्वी तांदूळ वाटप केले जायचे तीच पत्रिका समजली जायची. लग्नघरी काही दिवस आधीच आणि नंतर नातेवाईकांचा जणू राबता असायचा. आता रक्ताचे नातेवाईक लग्नाच्या दिवशी सकाळी येतात.
निमंत्रण आता फोनवरच
पूर्वी बाहेरगावी असलेल्या नातेवाइक व जवळील व्यक्तींना पत्रिका देण्यासाठी एक खास दौरा काढला जायचा. यात जवळची गावे लग्न दोन दिवसावर आल्यावर वाटायला घेतली जायची. प्रथम लांबच्या गावांच्या पत्रिका वाटल्या जायच्या. अगदी गहरी जावून घरातील कर्त्या व्यक्तीच्या हातात पत्रिका देऊन निमंत्रण दिले जायचे .
आता पत्रिका देणारा आणि स्वीकारणारा दोघांनाही वेळ नाही. आता मजकूर आटोपशीर झाला आहे. कारण देनारालाही वेळ नाही आणि पत्रिका स्वीकारणाराही फक्त आपले नाव आणि ठिकाण कुठे आहे एवढेच वाचतो कारण पुन्हा त्याला फोन किंवा मॅसेज येणार आहे.
आता डिजिटल पत्रिका आणि नवरा नवरीचे फोटो
पूर्वी लग्न झाल्यानंतरही काही दिवस एकमेकांचे तोंडही न बघणारे नवरा नवरी आता लग्नापूर्वीच पत्रिकेवर दिसतात. त्यामुळे निमंत्रण त्यांचे आई वडील देताहेत कि नवरा नवरी हेच लक्षात येत नाही. माणसाने काळाबरोबर असायला हवं पण काळच एकाएकी बदलावा काळाच्या पुढे जावू नये असे जुने जानते मंडळी म्हणत असत. पूर्वीचे लग्न म्हणजे फक्त लग्न नसायचे तर सर्व पाहुणे एकत्र येवून साजरा केलेला एक प्रकारचा आनंद असायचा. आता तो पैसे आणि बडेजाव यामध्ये हरवत चाललेला दिसत आहे.