सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक
पुरंदर ता.30: सासवड येथील सोपानगरच्या जवळ सुमारे साडेचारशे विविध प्रकारची झाडे ‘आम्ही झाड करी’ या मित्रांनी लावली होती. त्याचे संगोपन देखील चांगले केले होते. या झाडांना खते कीटकनाशके टाकून, त्याला ड्रीपची लाईन केली होती. परंतु रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमानी या ठिकाणी आग लावून, सर्व जाडे जाळून टाकली. या आगीत एकही जाड वाचले नाही. अशी माहिती वृक्ष लागवड करणारे ‘आम्ही झाडकरी’ या मित्रापैकी मिलिंद गुजर यांनी दिली. या झाडाचे आम्ही सर्वांनी अत्यंत जिवापाड संगोपन केले होते. यात आंबा, जांभूळ विविध प्रकारच्या झाडांच्या बिया आणून, त्याचे संगोपन केले होते. झाडे मोठी झाल्यामुळे ड्रीप पद्धतीने पाणी सोडले जात होते. ही झाडे पावसाळ्यात विविध ठिकाणी लावण्याचा आमचा माणस होता, पण अज्ञात इसमाने रात्री उशिरा या ठिकाणी आग लावली. यात सर्व झाडे जळून खाक झाली.
आम्ही वृक्ष संवर्धन करतो, कारण आता झाडांची संख्या अत्यल्प झाली असल्याने, तापमान वाढत चालले आहे. पूर्वीच्या प्रमाणे पुरंदर हिरवागार होता तसा व्हावा ,असा आमचा प्रयत्न आहे. पण काही समाजकंटक अशा प्रकारे कृत्य करून वाढलेली झाडे जाळून, टाकत असल्याने आमच्या प्रयत्नांना यश येत नाही. असे त्यांनी सांगितले. अशा समाजकंटकावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.