उरुळी कांचन, (पुणे) : स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित, उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीने आपल्या यशाची परंपरा कायम राखत सीबीएसई दहावीच्या निकालात बाजी मारली आहे. विद्यालयाचा निकाल सलग सातव्या वर्षी शंभर टक्के लागला असून, गुणवत्तेच्या सातत्याची परंपरा यंदाही विद्यार्थ्यांनी अधोरेखित केली आहे. यावर्षीच्या निकालात विद्यार्थिनींनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

विद्यालयातील पहिल्या पाच गुणवंतांची यादी खालीलप्रमाणे
1) अंजली चंद्रकांत गाढवे – 95 टक्के (प्रथम)
2) सिद्धी शरद खेडकर – 93.20 टक्के (द्वितीय)
३) ईशा संदीप चौधरी – 92.80 टक्के (तृतीय)
४) सोहम संदीप खेडेकर – 92.40 (चतुर्थ)
५) प्रियांका तुकाराम दवणे – 92 टक्के (पाचवा)
तसेच, विद्यार्थ्यांनी केवळ एकूण टक्क्यांतच नव्हे, तर विषयानुसारही कडक कामगिरी केली आहे. संस्कृती विजय फडतरे हिने माहिती तंत्रज्ञान (IT) विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळवले. इंग्रजी विषयात अंजली गाढवे व संस्कृती फडतरे (97 गुण) हिंदीत सिद्धी खेडकर (98 गुण), विज्ञानात स्पर्श मुकेश राठोर (93 गुण), समाजशास्त्रात ईशा चौधरी व प्रियांका दवणे (95 गुण), गणितात अविनाश दिगंबर वतणे (88 गुण) मिळवले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल बोलताना प्राचार्य डॉ. सुमित दास म्हणाले की, “विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे योग्य नियोजन आणि पालकांनी दाखवलेला विश्वास यामुळेच हे यश शक्य झाले आहे. आमच्या शाळेतील मुले सीबीएसई बोर्डात अशी कामगिरी करतात, याचा सार्थ अभिमान वाटतो.”
दरम्यान, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या सर्व विश्वस्तांनी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. उरुळी कांचन परिसरात विद्यालयाच्या या यशाचे मोठे कौतुक होत आहे.







