पुणे: बिहार विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’मधील (Sharad Pawar) घटक पक्ष भाजप, जनता दल (युनायटेड) आणि (Bihar Election 2025) लोक जनशक्ती (रामविलास) पक्ष यांनी मिळून स्पष्ट बहुमत मिळवत जोरदार विजय मिळवला. मात्र या निकालावर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निकालावर प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे. (Breaking News)

बारामती येथे बोलताना शरद पवार यांनी दावा केला की, बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपये जमा केले आणि त्यामुळेच एनडीएचा विजय झाला. शरद पवार म्हणाले की, “मला अधिकृत माहिती नाही, पण काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. मतदानानंतर मी काही लोकांशी संवाद साधला. त्यांनी दिलेल्या फीडबॅकनुसार या निवडणुकीत महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घेतला. आणि जेव्हा महिलांचा एवढा प्रतिसाद दिसला, तेव्हा मला असा संशय आला की ज्या योजनेअंतर्गत प्रत्येकी 10 हजार रुपये दिले गेले, त्याचा प्रभाव या निकालावर पडला असावा.”
ते पुढे म्हणाले, “जसे महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण’ योजना आली, तोच प्रकार बिहारमध्येपण झाला आहे. पुढे ज्या पक्षाकडे सत्ता आहे त्यांनी निवडणुकीच्या आधी अशा प्रकारे आर्थिक मदत वाटण्याचा प्रयत्न केला, तर लोकांच्या मनात निवडणूक प्रक्रियेबद्दल शंका निर्माण होईल. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे वाटणे योग्य आहे का? याचा गंभीरपणे विचार नक्कीच व्हायला हवा. निवडणूक आयोगानेही ही बाब तपासावी, कारण निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शक व्हाव्यात याची जबाबदारी त्यांची आहे.”
पवारांनी जुन्या आठवणी सांगत बारामतीतील पूर्वीची परिस्थितीही यावेळी सांगितली. “50 वर्षांपूर्वी बारामतीत म्युनिसिपालटीच्या निवडणुकीच्या आधी लोक वाटपाची वाट बघायचे आणि त्यावरून निकाल ठरायचा. आता त्याच पद्धतीने राज्यात 10-10 हजार रुपये देऊन तुम्ही निवडणूक घेताय म्हणजे या निवडणूका पूर्णपणे पारदर्शक नव्हत्या, अशी भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे. याचा विचार निवडणूक आयोगाने करणे गरजेचे आहे,” असंही पवार म्हणाले.







