उरुळी कांचन: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Uruli Kanchan News) यांनी अथक परिश्रम व प्रचंड जिद्दीच्या जोरावर संविधान लिहिले आहे आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी जगातील सर्वात मोठी (Pune News) लोकशाही असलेल्या भारत वासीयांना हे संविधान सुपूर्द केले आहे. तेव्हापासून आपला देश संविधानाच्या आधारे चालतो. आपले संविधान फक्त कायद्याचा ग्रंथ नाही, तर जीवन जगण्याचा मार्ग आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कामगार आघाडीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे यांनी केले आहे.

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, बँका, ग्रामपंचायत कार्यालय व पोलीस ठाण्यात बुधवारी (ता.26) संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय राज्यघटनेने दिलेली उद्देशिकेचे पठण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन गणेश कांबळे यांनी केले. यावेळी कोमल कांबळे, सिद्धांत आडागळे, सागर शिंदे, विवेक कोळी, रमेश कोळी, सहस्त्रभुज कांबळे, रोहित लंकेश्वर, प्रकाश कांबळे, कमलेश लोंढे, किरण तुपे, ह्रतिक तुपे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना गणेश कांबळे म्हणाले की, न्याय, स्वतंत्रता, समानता आणि बंधुत्व या मूल्यांवर आधारित आपले संविधान आपल्याला एक सशक्त, न्याय्य आणि प्रगत समाज निर्माण करण्याची ताकद देते. संविधानातील तत्त्वांचा सन्मान राखू, त्यांना आपल्या मनात जपू आणि लोकशाहीची बळकट करू. असे आवाहन कांबळे यांनी यावेळी केले आहे.







