पुणे: अजित पवारांच्या अनपेक्षित (Sunetra Pawar) जाण्याने बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र सुन्न आहे. मात्र, या दु:खाच्या सावटाखाली राजकारणात अशा काही हालचाली घडल्या, ज्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यावरून उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. आता याच मुद्द्यावर बसपाचे प्रदेश महासचिव काळुराम चौधरी यांनी एक असा दावा केला आहे, ज्यामुळे पवारांच्या कुटुंबातील अंतर्गत संघर्षाचे पडसाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

चौधरांच्या मते, सुनेत्रा पवारांचा शपथविधी हा केवळ सत्ताप्राप्तीचा प्रयत्न नव्हता, तर ते एक ‘डॅमेज कंट्रोल’ होतं. “जर वहिनींनी तातडीने पद स्वीकारलं नसतं, तर त्यांना आणि त्यांच्या दोन्ही मुलांना, कुटुंबाने आणि राजकारणाने वाळीत टाकलं असतं,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा वहिनींना ‘बाहेर’ काढण्याच्या हालचाली खुद्द पवार घराण्यातूनच सुरू झाल्या होत्या, असा त्यांचा रोख आहे. शरद पवार साहेब नेहमीच राजकारण करतात, त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून ते दिसून येत,” अशा कडक शब्दांत त्यांनी टीका केली.
अजित पवार यांच्या निधनानंतरही शरद पवार याचं वागण योग्य नव्हत, सोनगावला अस्थी सावडलं आणि एक तासानंतर साहेब (शरद पवार) नीरा नदीवर गेले? नदीच प्रदूषण त्यांना त्याच वेळी कसं सुचलं? असे अनेक प्रश्न काळुराम चौधरी यांनी उपस्थित केले आहे.
नेहमीच अजितदादांना धारेवर धरणारे चौधरी आज त्यांच्या कुटुंबाच्या बचावासाठी पुढे आले आहेत. त्यांनी शरद पवारांच्या कृतीवर शंका उपस्थित केली आहे. दरम्यान, पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







