भोर: पुणे जिल्ह्यातील भोर तालुका हादरवणारी घटना (Bhor News) समोर आली आहे. चिखलगाव रावडी गावाच्या हद्दीत असलेल्या धोम–बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यात 30 ते 35 वर्षांच्या महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत महिलेची ओळख राधिका सुरेश सावंत अशी पटली आहे. (Latest Marathi News)

स्थानिक नागरिकांना कालव्यातून मृतदेह वाहून जाताना दिसल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर भोर पोलीस ठाणे चे पथक घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. प्राथमिक तपासात मृतदेहाजवळील पुरावे आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिलेची ओळख निश्चित करण्यात आली.
मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. आत्महत्येचा प्रकार आहे की अन्य काही घडले, याचा तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून वैद्यकीय अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
धरण आणि कालव्यांच्या परिसरात सुरक्षिततेचे प्रश्न वारंवार उपस्थित होत असताना ही घटना चिंतेची ठरली आहे. स्थानिक प्रशासनाने कालव्यांच्या कडेला सुरक्षेची उपाययोजना आणि दक्षता वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून अधिकृत निष्कर्षाची प्रतीक्षा आहे.







