पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Supriya Sule) दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत गेल्या (Ajit Pawar Death) काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता विराम (Parth Pawar Land Scam) मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर या चर्चांना वेग आला होता. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात (Maharashtra Politics) विलीनीकरणासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली होती, असा दावा काही नेत्यांकडून केला जात होता. मात्र आता या शक्यतांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Breaking News)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट भूमिका मांडली. “अजित पवारांनी घेतलेले निर्णय त्यांच्यासोबतच गेले आहेत. आता माझा भाऊ नाही, त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चांना काहीच अर्थ उरत नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यांच्या या वक्तव्यानंतर विलीनीकरणाच्या चर्चांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, पुण्यातील गाजलेल्या मुंढवा भूखंड प्रकरणावरूनही सुळे यांनी सावध प्रतिक्रिया दिली. विकास खारगे समितीच्या अहवालात पार्थ पवार यांना दिलासा मिळाल्याची चर्चा आहे. मात्र “महसूल विभागाचा अहवाल अधिकृतपणे प्रसिद्ध झालेला नाही. तो प्रत्यक्ष वाचल्याशिवाय केवळ सूत्रांच्या आधारे भाष्य करणे योग्य ठरणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणावर बोलताना त्यांनी कौटुंबिक संवादाचाही उल्लेख केला. “जेव्हा पार्थचे नाव प्रथम समोर आले, तेव्हा मी स्वतः त्याच्याशी संवाद साधला होता. त्याने मला ‘मी काहीही चुकीचे केलेले नाही’ असे स्पष्ट सांगितले. मी माझ्या पुतण्याच्या शब्दांवर विश्वास ठेवला,” असे सुळे म्हणाल्या.
सुळे यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या राजकीय समीकरणांबाबत नवे संकेत मिळत असून, आगामी काळात पक्षाची स्वतंत्र वाटचाल अधिक ठळकपणे दिसण्याची शक्यता आहे.






