पुणे: पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत (Ajit Pawar) निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री (Pune Election) अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आता आपल्या पारंपरिक (Maharashtra Politics) बळावर लढणे कठीण झाल्याचे चित्र दिसत आहे. भाजपच्या वाढत्या ताकदीमुळे आणि इतर पक्षांच्या दबावामुळे अजित पवारांना स्वतःच्या पक्षाच्या उमेदवारांऐवजी इतर पक्ष, गट आणि स्थानिक नेते यांच्याशी फोडाफोडी व तडजोड करूनच मैदानात उतरावे लागलं आहे. (Breaking News)

भोर, जेजुरी, राजगुरुनगर (खेड), इंदापूर, तळेगाव ढमढेरे, फुरसुंगी अशा महत्त्वाच्या नगरपरिषदा-नगरपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला स्वबळावर तुल्यबळ उमेदवार उभे करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे भाजप, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना, शरद पवार गट आणि स्थानिक स्वतंत्र गटांकडून उमेदवार घेतले गेले किंवा पक्षामध्ये सामील केले गेले.
उदाहरणार्थ, बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतमध्ये कट्टर विरोधक रंजन तावरे यांच्याबरोबर आघाडी करावी लागली. जेजुरी नगरपरिषदेत माजी नगरसेवक आणि सर्वपक्षीय वर्चस्व असलेल्या दिलीप बारभाई यांचा मुलगा अजित गटात घेऊन आला. भोर नगरपरिषदेतील रामचंद्र आचारे यांना पक्षात आणले. खेड-राजगुरुनगरमध्ये तुल्यबळ उमेदवार नसल्याने प्रताप आहेर यांना नगराध्यक्षपदासाठी निवडले. तळेगाव ढमढेरे येथे भाजपचे प्रबळ वर्चस्व असल्यामुळे अडीच वर्षे नगराध्यक्षपदाची तडजोड करावी लागली, तर फुरसुंगी नगरपंचायतमध्ये शिवसेनेबरोबर तडजोड केली गेली.
या सर्व प्रक्रियेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. बाहेरून आयात केलेल्या उमेदवारांना संधी दिल्याने नाराजी वाढली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः ‘त्यांच्या खास स्टाइल’ने कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ग्रामीण भागात त्यांचे राजकीय वर्चस्व आता पूर्वीसारखे राहिलेले नाही.
यातूनच दिसतं की, भाजप पुणे जिल्ह्यात आपले पाय घट्ट रोवण्यास यशस्वी झाला आहे आणि अजित पवारांचा पक्ष आता फोडाफोडी व तडजोडींच्या जोरावरच निवडणूक लढवित आहे. या निवडणुकांमुळे पुणे जिल्ह्यातील बदलते राजकीय समीकरण स्पष्ट दिसत आहे.







