उरुळी कांचन, (पुणे) : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि समर्थ फाउंडेशनचे राजेशदादा पांडे यांच्या संयुक्त विद्यमाने देहू ते पंढरपूर मार्गावर वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दिनांक रविवारी (ता. 22) उरुळी कांचन येथील नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह जननिधी मल्टीस्टेट संस्था शाखेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये डोळे तपासणी, दंत तपासणी, रक्त तपासणी, तसेच महिला भगिनींसाठी मोफत मोमोग्राफी तपासणी आदी एकूण 13,500 रुपयांची वैद्यकीय तपासणी सेवा मोफत देण्यात आली.
या शिबिरात 262 पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला, त्यात विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या शिबिराचे उद्घाटन शहा, भोसले, पूजा सणस व रेखा तुपे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी हवेलीचे ज्येष्ठ नेते प्रा. के. डी. बापू कांचन, राजाराम कांचन, संतोष कांचन, पोलीस निरीक्षक शंकर पाटील, डॉ. समीर ननावरे, गणेश चौधरी, शरद खेडेकर, भाऊसाहेब कांचन, सुरेश सातव, प्रशांत भोर, डॉ. रवींद्र भोळे, मयुर जगताप, राजेंद्र काळे, आबासाहेब चव्हाण, अमित कांचन, मच्छिंद्र कड, ऋषिकेश शेळके, सिद्धार्थ जगताप, सनी चौधरी, अशोक गायकवाड, विराज जगताप, पत्रकार सुनील जगताप, जयदीप जाधव, अमोल भोसले आदींचा समावेश होता.
दरम्यान, या उपक्रमाचे आयोजन उरुळी कांचन येथील नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह जननिधी मल्टीस्टेट संस्था शाखेचे अध्यक्ष विकास जगताप, श्रीकांत कांचन, संचालक अक्षय बंटी कांचन, सल्लागार सचिन काळे, ॲड. सुमित वनारसे, रमाकांत भोसले, आर्चीस वाडेकर, मॅनेजर अनिल महाडिक, पुनम बोराटे, आशिष बारवकर आणि अनेक कार्यकर्त्यांनी केले. वारकऱ्यांच्या सेवेसाठी घेतलेला हा उपक्रम समाजासाठी आदर्शवत ठरला आहे.







