पुणे: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पूर आला असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अजूनही अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांमध्ये पुणे, कोल्हापूर आणि कोकण प्रदेश यांचा समावेश आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर आला आहे, सखल भागात पाणी साचल्याची नोंद असून याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 40 हजार 949 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.

मुसळधार पावसामुळे पिकांचे किती नुकसान झाले, पाहूया

अमरावती- 12,565 हेक्टर
चंद्रपूर -1,572हेक्टर
अकोला- 909 हेक्टर
बुलडाणा- 6,699 हेक्टर
जळगाव – 4,538 हेक्टर
पालघर – 796 हेक्टर
लातूर – 957 हेक्टर
जालना- 1,726 हेक्टर
छत्रपती संभाजीनगर -456 हेक्टर
सोलापूर- 1,682 हेक्टर
अहिल्यानगर – 1,441 हेक्टर
नाशिक – 3,523 हेक्टर
पुणे – 676 हेक्टर
कोल्हापूर – 95 हेक्टर
सांगली – 6 हेक्टर
सातारा- 73हेक्टर
उडीद, ज्वारी, तीळ, मका, भुईमूग, कांदा, भाजीपाला, भात, मूग, टोमॅटो, कांदा-बटाटा, लिंबू, पपई, केळी, संत्रा, मोसंबी, आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे, अनेक रस्ते आणि महामार्ग पूर आणि भूस्खलनाने प्रभावित झाले आहेत. नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि आवश्यकतेशिवाय प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.







