नवी दिल्ली: NEET-UG परीक्षेतील पेपर फुटीचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असून, या गंभीर विषयावर न्यायालयाने केंद्र सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. भविष्यात अशा प्रकारच्या पेपर फुटीच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी परीक्षेचे स्वरूप अधिक कडक आणि सुरक्षित करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. विशेष म्हणजे, भविष्यातील परीक्षा संगणकीय प्रणालीद्वारे (ऑनलाइन) घेण्याबाबत गांभीर्याने विचार करण्यात येत आहे. या बदलांबाबत सरकारने तज्ज्ञांशी चर्चा करून लवकर निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. पेपर लीक प्रकरणाचा तपास सीबीआयद्वारे वेगाने सुरू असून, तो आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे.

तपासादरम्यान सीबीआयने न्यायालयात धक्कादायक माहिती सादर केली आहे. आरोपी मनिषा वाघमारे आणि प्रल्हाद कुलकर्णी यांनी संगनमत करून NEET-UG चा गोपनीय पेपर लीक करण्याचा मोठा कट रचला होता.
आरोपी मनिषा वाघमारे आणि प्रल्हाद कुलकर्णी यांनी परीक्षेचे पेपर चोरून ते बेकायदेशीरपणे वितरित करण्यामध्ये या दोघांचा थेट सहभाग असल्याचे गंभीर आरोप सीबीआयने ठेवले आहेत. या रॅकेटचे जाळे नेमके किती मोठे आहे आणि त्यात आणखी कोणाकोणाचा समावेश आहे, याचा शोध घेण्यासाठी सीबीआयचा तपास जोरात सुरू आहे. 5 जून रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






