पुणे : दिल्लीतील जंतर मंतरवर गेल्या 36 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे.मात्र या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला तीव्र लाठीमार तसेच त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे.या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीने (CJP) सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या.पण त्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत.आता आंदोलक विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेतले नाहीत तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा अभिजित दीपिकेंनीं दिला आहे.

CJP चे कार्यकर्ते अभिजित दिपके यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे न घेतल्यास आणि त्यांचा छळ सुरूच राहिल्यास देशभरात पुन्हा एकदा शांततापूर्ण आंदोलन छेडले जाईल, असे त्यांनी नमूद केले. पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनीही सरकारने दिलेला शब्द पाळावा, अन्यथा देशव्यापी आंदोलन उभे केले जाईल असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता सरकार यावर काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या आंदोलनामुळे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर CJP च्या प्रतिनिधींनी उर्वरित मागण्यांवर सरकारशी चर्चा केली. 25 जुलै 2026 रोजी झालेल्या या चर्चेत सरकारने विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, सरकारने दिलेले हे आश्वासन अद्याप पाळले नसल्याचा आरोप CJP ने केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी ही विद्यार्थ्यांना दिलेल्या आश्वासनाच्या विरोधात जात असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.






