Manoj Jarange Patil : जालना, : मराठा-कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, 40 अंशांहून अधिक तापमान असतानाही त्यांनी कोणत्याही मंडप, कुलर किंवा विशेष सुविधांशिवाय थेट शेतशिवारात उपोषण सुरू केले आहे. Manoj Jarange Patil

जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली. त्यांनी जरांगेंना सावलीत बसण्याची विनंती केली. मात्र, “मी ऊन्हात बसलो तर चटके तुम्हाला बसतील, म्हणून मी इथेच बसणार,” असे ठाम उत्तर जरांगे यांनी दिले. तसेच, “मी कुठल्याही मंत्र्यासमोर हात जोडत नाही, पण मला हे भोगू द्या,” अशी भावनिक भूमिका त्यांनी मांडली. Manoj Jarange Patil

मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी सातारा आणि हैदराबाद गॅझेटच्या आधारे तातडीने जीआर काढावा, अशी मागणी करत त्यांनी राज्यभरातील अभ्यासकांना आंतरवाली सराटीत येण्याचे आवाहन केले. सरकारने यापूर्वी अनेकदा वेळ मागितला असून समाजाने संयम दाखवला आहे, आता निर्णयाची वेळ आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Manoj Jarange Patil
दरम्यान, सरकारकडून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तरावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे, मराठा-कुणबी प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेत दिरंगाई आणि हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कन्नडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. Manoj Jarange Patil
जरांगे यांच्या उपोषणाला समाजाचा वाढता पाठिंबा मिळत असून अनेक कार्यकर्तेही त्यांच्या सोबत उपोषणात सहभागी झाले आहेत. आता सरकार जरांगे यांचे उपोषण थांबवण्यात यशस्वी होते की आंदोलन आणखी तीव्र होते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. Manoj Jarange Patil







