Ladaki Bahin Yojana : मुंबई, : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या पात्र महिलांच्या खात्यात मागील तीन महिन्यांचे रखडलेले हप्ते एकरकमी जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासन स्तरावर यासंदर्भातील हालचाली वेगाने सुरू असून, लवकरच अधिकृत निर्णय जाहीर होण्याची चर्चा आहे. Ladaki Bahin Yojana :
महायुती सरकारने जून २०२४ मध्ये सुरू केलेल्या या योजनेला सुरुवातीपासून मोठा प्रतिसाद मिळाला होता. तब्बल २ कोटी ४७ लाख महिलांनी यासाठी अर्ज केले होते. मात्र, अर्जांची पडताळणी सुरू झाल्यानंतर अनेक अर्ज अपात्र ठरले. उत्पन्न मर्यादा, सरकारी नोकरी आणि इतर निकषांच्या तपासणीत काही गैरप्रकारही उघडकीस आले. काही ठिकाणी महिलांच्या नावाने पुरुषांनी अर्ज केल्याचेही समोर आले होते. Ladaki Bahin Yojana :

या छाननीनंतर मार्चअखेरपर्यंत सुमारे ६८ लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले होते. मात्र शासनाने ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मुदत दिल्यानंतर एप्रिल महिन्यात सुमारे १४ लाख महिलांनी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे आता अपात्र लाभार्थ्यांची संख्या कमी होऊन ५४ लाखांवर आली आहे. Ladaki Bahin Yojana :
याच पार्श्वभूमीवर, पात्र ठरलेल्या महिलांना मागील तीन महिन्यांचे रखडलेले हप्ते म्हणजेच तब्बल ४ हजार ५०० रुपये एकाचवेळी देण्याचा विचार प्रशासन स्तरावर सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे अनेक आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळू शकतो.
दरम्यान, तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे विविध जिल्ह्यांतील महिला व बालविकास विभाग तसेच लाभार्थी महिलांकडून पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी केली जात आहे. Ladaki Bahin Yojana :
दरम्यान, शासन याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यास आणखी हजारो महिलांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.आता शासनाच्या अंतिम निर्णयाकडे राज्यातील लाखो ‘लाडक्या बहिणी’चे लक्ष लागले आहे. Ladaki Bahin Yojana :






