पुणे : महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही एक अत्यंत लोकप्रिय योजना आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट डीबीटीद्वारे दरमहा 1500 रुपये जमा केले जातात.. आगामी गणेशोत्सवाच्या काळात, म्हणजेच 16 सप्टेंबरनंतर पुढील हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.

या योजनेचा फायदा मिळवण्यासाठी प्रशासनाने काही महत्त्वाचे निकष निश्चित केले आहेत.त्यानुसार महिलेचे वय 21 ते 65वर्षांच्या दरम्यान असावे.महिला महाराष्ट्राची मूळ रहिवासी असणे अनिवार्य आहे. कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.50लाखांपेक्षा जास्त नसावे.
या योजनेच्या लाभासाठी विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिला या पात्र आहे.

महिलांनी केवळ ई-केवायसी पूर्ण केल्याने हप्ता नियमित मिळेलच असे नाही, तर इतर सर्व अटींची पडताळणी करणेही गरजेचे आहे. प्रशासनाकडून झालेल्या तपासणीत त्रुटी आढळल्यास त्यांचा लाभ बंद होऊ शकतो.

अपात्र आढळलेल्या किंवा नियमांचे उल्लंघन केलेल्या अर्जदारांचा लाभ कायमचा बंद करण्यात येत आहे. त्यामुळे ज्या महिलांची माहिती पूर्ण आणि अचूक आहे, त्यांच्याच खात्यात पुढील 1500 रुपयांचा हप्ता सुरक्षितपणे जमा केला जाईल.






