Big Breaking पुणे, ता. १५ : पुणे जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) बैठकीत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी प्रशासनासमोर ग्रामीण पुण्याच्या प्रश्नांचा अक्षरशः पाढाच वाचला. पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्गावरील प्रस्तावित उन्नत मार्गांच्या कामांमुळे भविष्यात वाहतुकीचा मोठा विस्फोट होण्याची शक्यता व्यक्त करत, “काम सुरू करण्यापूर्वी वाढीव लेन तयार करा, अन्यथा पुणेकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल,” असा सज्जड इशारा त्यांनी प्रशासनाला दिला. Big Breaking

राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे ही महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्याच्या अंतिम विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. मात्र बैठकीचा केंद्रबिंदू ठरले ते राहुल कुल यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि प्रशासनावर केलेला थेट हल्लाबोल. Big Breaking
बैठकीत बोलताना राहुल कुल यांनी महामार्गांवरील वाहतूक कोंडीचा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडला. “पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्ग आधीच वाहनांच्या ताणाखाली दबले आहेत. त्यात उन्नत मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट होईल. त्यामुळे प्रशासनाने आधीच रस्त्याच्या बाजूला वाढीव लेन तयार करून वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करावी,” अशी आग्रही मागणी त्यांनी केली. वाहतुकीच्या प्रश्नावर योग्य नियोजन न झाल्यास नागरिकांना तासन्तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. Big Breaking
ग्रामपंचायत इमारतींपासून स्मशानभूमीपर्यंत रखडलेल्या कामांवर संताप
ग्रामीण भागातील रखडलेल्या विकासकामांवरही राहुल कुल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायत इमारती, स्मशानभूमी, गावांतर्गत रस्ते आणि सामाजिक सभागृहांची अनेक कामे वर्षानुवर्षे रखडल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. “ग्रामीण भागातील नागरिकांना अजूनही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. प्रशासनाने कागदोपत्री विकास न दाखवता प्रत्यक्ष कामे पूर्ण करावीत,” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. Big Breaking
“ई-निविदेशिवाय खरेदी नको”; विकासकामांत पारदर्शकतेवर भर
दिव्यांग बांधवांसाठीचे साहित्य वाटप आणि खेळाडूंसाठी क्रीडा साहित्य खरेदी करताना ‘ई-निविदा’ प्रणाली सक्तीची करण्याची मागणीही त्यांनी केली.“पारदर्शकता आणि दर्जेदार साहित्य मिळण्यासाठी सर्व खरेदी प्रक्रिया ऑनलाईन आणि खुल्या पद्धतीने व्हायला हव्यात,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मंजूर विकासकामे ठरलेल्या वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाली पाहिजेत, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. Big Breaking
पुणे जिल्ह्यासाठी ‘पर्यटन मास्टर प्लॅन’ची मागणी
पुणे जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करत राहुल कुल यांनी जिल्ह्यासाठी स्वतंत्र पर्यटन आराखडा तयार करण्याची मागणी केली. “पुण्याला गडकिल्ले, धार्मिक स्थळे आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. योग्य नियोजन झाल्यास पर्यटनातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते,” असे त्यांनी सांगितले. यासोबतच ‘किल्ले संवर्धन विशेष मोहीम’ राबवून ऐतिहासिक वारसा जपण्यावर भर देण्याची मागणी त्यांनी केली.
रिंग रोड, अष्टविनायक महामार्ग आणि वृक्षारोपणावरही भर
पर्यावरण संरक्षणाचा मुद्दाही राहुल कुल यांनी बैठकीत जोरदारपणे मांडला. प्रस्तावित रिंग रोड, गडकिल्ले परिसर आणि अष्टविनायक महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी इलेक्ट्रिक पंप मंजूर करण्याचा विषयही त्यांनी प्रशासनासमोर ठेवला. Big Breaking
बैठकीत प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार
या बैठकीस जिल्ह्यातील सर्व मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राहुल कुल यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे. डीपीडीसी बैठकीत राहुल कुल यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे ग्रामीण पुण्याच्या प्रश्नांना पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी स्थान मिळाले आहे. Big Breaking







