Bollywood Controversies 2025: 2025 हे वर्ष बॉलिवूडसाठी अत्यंत नाट्यमय आणि मोठ्या वादांनी भरलेले ठरले आहे. या संपूर्ण वर्षभरात अनेक सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले. या वर्षातील काही मोठ्या घडामोडींचा आढावा घेतला असता, अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. चित्रपटसृष्टीसाठी वर्षाची सुरुवातच खूप भीतीदायक ठरली. जानेवारी 2025 मध्ये अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे येथील घरावर एका अज्ञाताने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.

-
वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी 2025 मध्ये वांद्रे येथे अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या राहत्या घरावर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली.
- अक्षय खन्ना याने ‘दृश्यम 3’ चित्रपट शेवटच्या क्षणी सोडल्यामुळे निर्मात्यांनी त्याच्यावर टीका केली.
- ‘कांतारा’ या दाक्षिणात्य चित्रपटाची नक्कल करणे रणवीर सिंगला महागात पडले, ज्यासाठी त्याला जाहीर माफी मागावी लागली.
-
ज्येष्ठ गायक उदित नारायण यांचा एका मैफिलीत महिला चाहतीसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यावर चाहत्यांच्या प्रेमाचा भाग असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले तरीही सोशल मीडियावर मोठी टीका झाली.
- ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी देखील पापाराझींच्या (फोटोग्राफर्स) पेहरावावर आणि वागणुकीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली, ज्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला.
-
आई झाल्यानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने कामाच्या ठिकाणी 8 तासांच्या शिफ्टची मागणी केली, परंतु या अटीमुळे तिला कल्कि 2989 AD च्या पुढील भागातून आणि स्पिरिट या मोठ्या चित्रपटांमधून बाहेर पडावे लागले.
-
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच वेबसीरिजमध्ये माजी अधिकारी समीर वानखेडे यांची खिल्ली उडवल्याचा आरोप झाला, ज्यावरून सध्या न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू आहे.
-
गायक दिलजीत दोसांझच्या सरदार जी 3 या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका असल्यामुळे भारतात मोठा विरोध झाला आणि एप्रिलमधील पहलगाम घटनेनंतर या वादाचे रूपांतर चित्रपट प्रदर्शनावर बंदी येण्यात झाले.
-
अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यात हेरा फेरी ३ चित्रपटाच्या निवडीवरून मोठे मतभेद समोर आले, मात्र नंतर ही केवळ चित्रपटाच्या जाहिरातीची रणनीती असल्याची चर्चा रंगली.
- आर्थिक आणि कायदेशीर वादांमध्ये दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात अटक झाली.
-
उद्योजक संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांची मुले आणि दुसरी पत्नी प्रिया सचदेव यांच्यात अफाट संपत्तीवरून कायदेशीर वाद निर्माण झाला असून हे प्रकरण सध्या चर्चेत आहे.
- ‘गेम चेंजर’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस आकड्यांवरून राम गोपाल वर्मा यांनी केलेला ‘फ्रॉड’चा आरोप
- ‘जाट’ चित्रपटातील एका चर्चमधील दृश्यावर ख्रिश्चन समाजाने आक्षेप घेतल्याने ते दृश्य काढून टाकावे लागले.
- ‘रांझणा’ चित्रपटाचा शेवट एआय (AI) वापरून बदलण्यात आल्याने नवीन वाद सुरू झाला. मूळ सिनेमात धनुषच्या पात्राचा मृत्यू होतो, पण एआयमुळे त्याला जिवंत दाखवण्यात आले.
- सलमान खानचे दिग्दर्शक ए. आर. मुरुगादॉस यांच्यासोबतचे मतभेद यांमुळे 2025 हे वर्ष बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त वर्षांपैकी एक ठरले आहे.
2025 हे वर्ष बॉलिवूडसाठी संघर्षाचे आणि अनेक अनपेक्षित वळणांचे ठरले. सिनेमॅटिक यशापेक्षा कलाकारांच्या वैयक्तिक भूमिका आणि वादग्रस्त वक्तव्यांनीच हेडलाईन्स व्यापल्या होत्या. आता चाहत्यांचे लक्ष 2026 कडे लागले असून, नवीन वर्ष सिनेसृष्टीसाठी सकारात्मकता, मोठे सिनेमे आणि केवळ निखळ मनोरंजन घेऊन येईल, अशी आशा सर्वत्र व्यक्त केली जात आहे.







