मुंबई: बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना काल रात्री एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले. मुंबईतील जुहू परिसरात अक्षय कुमारच्या ताफ्यातील एका गाडीला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका जोरदार होता की, त्यात एका ऑटोरिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

सोमवारी रात्री ८:३० ते ९ च्या सुमारास अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना विमानतळावरून जुहू येथील त्यांच्या घरी परतत होते. त्यांचा ताफा इस्कॉन मंदिर परिसराजवळ पोहोचला असताना, मागून येणाऱ्या ऑटोरिक्षाने कारला जोरदार धडक दिली. मर्सिडीजचा वेग इतका जास्त होता की, ती रिक्षा थेट अक्षयच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षक असलेल्या कारवर जाऊन आदळली. अपघातात अक्षयच्या ताफ्यातील गाडी उलटली, तर ऑटोरिक्षाचा चक्काचूर होऊन चालक आणि एक प्रवासी त्यात अडकले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे अक्षयच्या सुरक्षिततेबद्दल चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, अक्षय आणि ट्विंकल दुसऱ्या गाडीत असल्याने ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. अपघात होताच अक्षय कुमारने वेळ न घालवता आपल्या गाडीतून खाली उतरून जखमींना मदत केली.







