Rohit Pawar : लोणी काळभोर, (पुणे) : “दोन दिवसांत आरोपींना बेड्या ठोकल्या नाहीत, तर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला जाईल,” असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. Rohit Pawar
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आळंदी म्हातोबा (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संग्राम भंडारे व अक्षय कांचन (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) तसेच इतर 10 ते 12 जणांनी वाहनाचा पाठलाग करत गाडी अडवली. त्यानंतर त्यांच्या अंगावर काळी शाई फेकण्यात आली तसेच धक्काबुक्की करण्यात आली. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ लवांडे यांची भेट घेण्यासाठी व आरोपींवर कारवाई करण्यात यावी. यासाठी रोहित पवार लोणी काळभोर येथील पोलीस ठाण्यात लवांडे यांची भेट घेऊन प्रसार माध्यमाशी संवाद साधला यावेळी रोहित पवार बोलत होते. Rohit Pawar

यावेळी बोलताना रोहित पवार यांनी अनेक गंभीर आरोप केले. “विकास लवांडे यांना काही दिवसांपूर्वी दोन जणांनी बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या टोळीत तो ‘भंडारी’ नावाचा बोंदू महाराज आणि कांचन नावाचा सराईत गुन्हेगार सामील आहे,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. या गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. Rohit Pawar
पोलिसांनी याप्रकरणी कडक कलमे लावून गुन्हेगारांना ताब्यात घेण्याचे आश्वासन दिले आहे. “आम्ही पोलिसांच्या वर्दीचा आदर करतो, म्हणून त्यांना दोन दिवसांचा वेळ दिला आहे. जर दोन दिवसांत काही ठोस कारवाई झाली नाही, तर सोलापूर नॅशनल हायवेवर सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान चक्का जाम आंदोलन केले जाईल,” असेही रोहित पवार यांनी ठणकावून सांगितले. Rohit Pawar
विकासभाऊंनी आधीच निर्णय घेतला होता. की इथं मी आंदोलन करणार हे आंदोलन करणार. जोपर्यंत तो भंडारी भोंदू बाबा भोंदू महाराज जो आहे. त्याला ताब्यात घेत नाही तोपर्यंत मी इथं बसून राहणार. आम्ही त्यांना विनंती केली की दोन दिवस आपण पोलिसांना वेळ देऊया. आणि जर दोन दिवसात काही नाही झालं तर आम्ही अजून एक पत्र दिलेलं आहे. वारकरी संप्रदायाचा वारंवार अवमान करणाऱ्या आणि संतांबद्दल आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध आता पुण्यात रणशिंग फुंकले गेले आहे. विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि ‘बोंदू महाराजां’ना अटक करण्यासाठी वारकरी संप्रदायाने आक्रमक भूमिका घेतली आहे. असेही बोलताना रोहित पवार यांनी सांगिलते. Rohit Pawar
बहुजन समाजातील मुला-मुलींना शिक्षणातून डावलले?
रोहित पवार यांनी या ‘बोंदू महाराजां’च्या शैक्षणिक संस्थांवरही टीका केली. “आळंदी आणि नागपूर येथील त्यांच्या शाळांमध्ये बहुजन समाजातील मुला-मुलींना प्रवेश नाकारला जातो. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा हा अपमान आहे. संतांच्या नावाने शिवीगाळ करणे आणि भेदभाव करणे, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभा देणारे नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. Rohit Pawar
राजकीय नेत्यांवरही प्रहार
“जेव्हा संतांचा, महापुरुषांचा अपमान केला जातो, तेव्हा सत्ताधारी पक्षाचे नेते बिळात जाऊन का बसतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही कायम संतांच्या, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांसोबत आहोत आणि या विचारांना नख लावणाऱ्यांचा लढा असाच सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. Rohit Pawar





