Kolhapur : सध्या समाजातील लग्नासंबंधी प्रश्न जास्तच भयानक होतं चालला आहे. लग्न जुळत नाही, लग्न टिकत नाही, वाद होतात अशी अनेक कारणं आहे. या भेडसावणाऱ्या समस्येमुळे दररोज किती तरी वाईट घटना या घडत आहे. अशीच एक मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. लग्न जुळत नसल्यामुळे आलेल्या तीव्र नैराश्यातून एका तरुणाने पंचगंगा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना कोल्हापुरात घडली आहे. सातत्याने प्रयत्न करूनही विवाह जुळत नसल्यामुळे हा तरुण गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील या तरुणाचे नाव गोपनीय असून समाजात वाढत असलेले मानसिक दडपण आणि एकटेपणामुळे तो गहन नैराश्यात गेला होता. यामुळे हताश झालेल्या तरुणाने अखेरीस जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. kolhapur

काल गुरुवारी रोजी या तरुणाने कोल्हापूर येथील पंचगंगा नदीच्या पात्रात उडी मारून जीवनयात्रा संपवली. ही माहिती तात्काळ पसरताच परिसरात खळबळ उडाली आणि नदीकाठी नागरिकांची गर्दी झाली. स्थानिक नागरिक व प्रशासनाच्या मदतीने पोलिसांनी त्वरित शोधकार्य सुरू केले. तरुणाच्या आत्महत्येची बातमी कळताच त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. लग्न होत नाही म्हणून आलेल्या नैराश्यातून हा प्रकार घडल्यामुळे, अविवाहित तरुणांवर सामाजिक विषयावरून येत असलेल्या मानसिक ताणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
या घटनेची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तरुणाने कोणत्या परिस्थितीत हे टोकाचे पाऊल उचलले, याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी नैराश्यातून आलेल्या आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे. मानसिक आरोग्य आणि सामाजिक दडपण यांसारख्या गंभीर प्रश्नांकडे या घटनेने पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. kolhapur







