Ahilyanagar Leopard Attack : अहिल्यानगर तालुक्यातील खारे कर्जुने गावात एका अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने सर्व परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. खारे कर्जुने या भागात बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय मुलीचा जीव गेलाय. रियांका सुनील पवार असं या बालिकेचं नावं आहे. तिचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

नेमकं काय घडलं (Ahilyanagar Leopard Attack)
रिकांचे कुटुंब हे शेतमजूर आहेत. सध्या थंडीचा तडाखा वाढल्याने सर्वत्र शेकोट्या पेटवल्या जात आहे. रियकांचे घरतील काहीजण या शकोटी भोवती बसलले होते. रियांका त्यांच्या शेजारी खेळत होती. बाजूलाच असणाऱ्या तूरीच्या शेतातून बिबट आला आणि त्याने रियांकावर हल्ला करत, तिला उचलून नेलं.
ही घटना पाहून रियांकाच्या कुटुंबीयांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग सुरू केला. पण त्यांना बिबट्याचा काहीही मागमूस लागला नाही. काही वेळातच गावात लोकांची आरडाओरड होणाऱ्या दिशेने मोठी गर्दी जमा झाली. ग्रामस्थांनी आणि वन विभागाने मिळून तिचा शोध घेतला, पण बिबट्याचा कुठेही ठावठिकाणा सापडला नाही. दुसरा दिवस उगवला आणि तब्बल १६ तासांच्या शोधानंतर आज सकाळी काटवनात तिचा मृतदेह सापडला.
बिबट्या जेरबंद किंवा ठार मारण्याची मागणी
घटनेनंतर गावातील लोक खूपच संतापले आहेत. आणि ते बिबट्या जेरबंद किंवा ठार मारण्याची मागणी केली जात आहे. जो पर्यंत हा बिबट्या जेरबंद केला जाणार नाही, तो पर्यंत रियांकाचा मृतदेह ताब्यात घेणार नाहीत.
ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर बैठक घेतली आणि त्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांच्यावर दबाव आणला. ग्रामस्थांनी स्पष्ट सांगितले की, बिबट्याच्या वारंवार हल्ल्यांमुळे या परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे आणि वन विभागाने यावर तातडीने काहीतरी ठोस उपाययोजना कराव्यात.
रियांकाच्या मृत्यूनंतर गावात शोककळा पसरली आहे आणि ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, बिबट्या पकडल्यानंतरच ते तिच्यावर अंत्यसंस्कार करणार आहेत.







