सोलापूर: सोलापूर (Accident News) जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात काल रात्री झालेल्या भीषण अपघातात कार आणि ट्रकची धडक होऊन पाच जणांनी जागीच प्राण गमावले. विशेष म्हणजे, अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले अनिकेत गौतम कांबळे आणि त्यांची पत्नी मेघना यांचे लग्न फक्त चार दिवसांपूर्वीच झाले होते. पांगरी गावाजवळील जांभळबेट पुलावर एका मालवाहू ट्रकने मोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, या घटनेत कारचा चुराडा झाला आहे. गौतम कांबळे, जया कांबळे, संजय वाघमारे, सारिका वाघमारे यांच्यासह एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

26 नोव्हेंबर रोजी अनिकेत आणि मेघना यांचे लग्न झाले होते. व हे नवदाम्पत्य त्यांच्या कुटुंबियांसोबत देवदर्शनासाठी तुळजापूरला निघाले होते. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर झडप घातली. दरम्यान, जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या भीषण अपघातामुळे संपूर्ण बार्शी तालुक्यात शोककळा पसरली आहे. पांगरी पोलिस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत.






