पुणे: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (Pune Politics) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी (Pune Mahapalika Election) काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात थेट संघर्ष पाहायला मिळत आहे. भाजपकडून “सव्वाशे पार”चा नारा (Ajit Pawar) दिल्यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत भाजपवर थेट ईव्हीएमबाबत गंभीर आरोप केले आहेत. भाजपचे आमदार आणि प्रचाप्रमुख शंकर (Yogesh Bahal) जगताप यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप सव्वाशेहून अधिक जागा जिंकेल, असा दावा केला होता. पक्षात बंडखोरी होणार नाही आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य संधी दिली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, भाजपची पहिली उमेदवार यादी रविवारी जाहीर होणार असल्याची माहिती आहे. (Breaking News)

या वक्तव्यावर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल यांनी भाजपवर थेट ईव्हीएम हॅकिंगचा आरोप केला आहे. भाजप ईव्हीएम सेट केल्याशिवाय सव्वाशे पार करू शकणार नाही, असा दावा करत भाजपला 100 जागाही मिळवणं कठीण जाईल, असं बहल यांनी स्पष्ट केलं. भाजपने जर 125 जागा जिंकल्या तर आपण कायमचं राजकारण सोडू, असं उघड आव्हानही त्यांनी दिलं आहे.
भाजप सध्या फोडाफोडीचं राजकारण करत असून पक्षात येणाऱ्या लोकांना मशीनमधून आपोआप 2000 ते 2500 मते मिळतील, असा विश्वास दिला जात असल्याचा गंभीर आरोप बहल यांनी केला. ज्यांना स्वतःवर विश्वास नाही, तेच भाजपमध्ये गेले आहेत, असं म्हणत पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचीच सत्ता येईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकूणच पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात थेट लढत रंगण्याची चिन्हं स्पष्ट झाली असून, आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणूकपूर्व राजकीय वातावरण अधिकच तापत चाललं आहे. दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार का, याबाबत मात्र अद्याप अनिश्चितताच कायम आहे.







