Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संत कबीर-छत्रपती शाहू महाराज यांचे विचार म्हणजे शुद्ध प्रबोधन : डॉ. श्रीपाल सबनीस

राजेंद्रकुमार शेळकेby राजेंद्रकुमार शेळके
Tuesday, 25 June 2024, 17:56

पुणे : कबीर हे संतसाहित्यातील महानायक आहेत. त्यांचा एक वेगळा पंथ आहे, ज्याला मर्यादा नाही. कबीरांचे मानवतावादी विचार छत्रपती शाहू महाराज यांनी पुढे नेले. सामाजिक क्षेत्रात त्यांनी मानवतावादी भूमिकेतून समता साधली. समतेच्या विचारांची पेरणी करणारा पहिला राजा म्हणून छत्रपती शाहू महाराजांकडे पाहिले जाते. संत कबीर आणि छत्रपती शाहू महाराज यांचे विचार-कार्य म्हणजे शुद्ध प्रबोधन होय, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे विश्वपारखी संत कबीर व छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विश्वपारखी संत कबीर पुरस्काराने आचार्य रतनलाल सोनग्रा तर छत्रपती शाहूजी महाराज पुरस्काराने हनुमंत पपुल यांचा गौरव डॉ. सबनीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर होते. कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, परशुराम वाडेकर व्यासपीठावर होते. पंचशील शाल, ग्रंथ आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, आजच्या महाराष्ट्राचा नकाशा बेचिराख झाला आहे, तो छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, फुले-शाहू-आंबेडकर यांचा राहिलेला नाही. येथे जातीभेदांच्या भिंती निर्माण झाल्या असल्याने महापुरुषांच्या संवादी विचारांची बेरीज होणे आवश्यक आहे. त्यांच्या विचारांच्या सामर्थ्याची वाटणी होणे योग्य नाही. आजच्या काळात धार्मिक वाद निर्माण न करता सर्व धर्माच्या संकुचित भिंती दूर करून समाजपणे गरजेचे आहे. संत कबीर व छत्रपती शाहू महाराज यांचे विचार अमलात आणून ते समाजात पेरावे लागतील.

 

अध्यक्षपदावरून बोलताना ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, महापुरुषांच्या विचारांचा जागर व्हावा या उद्देशाने कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आचार्य रतनलाल सोनग्रा व हनुमंत पपुल यांचा अनुक्रमे संत कबीर तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे.

सत्काराला उत्तर देताना आचार्य रतनलाल सोनग्रा म्हणाले, ज्याला कबीराचा एक दोहा येतो तो भारतीय ही माझी भारतीयत्वाची व्याख्या आहे. महात्मा फुले, आचार्य अत्रे यांनी देखील कबीराची महती जाणली. कबीरांनी समाजाला बौद्धिक, वैचारिक, तार्किक, विवेकी विचार दिले. कबीर हे भारतीय ऐक्याचे प्रतिक आहेत. यामुळेच आजच्या परिस्थितीत भारतातील ऐक्य धोक्यात असताना कबीरांच्या विचारांची समाजाला खरी गरज आहे. पुरस्काराबद्दल हनुमंत पपुल यांनी आभार मानले.

कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची माहिती देत सूत्रसंचालन केले.

 

राजेंद्रकुमार शेळके

राजेंद्रकुमार शेळके

सन–२००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.दैनिक पुढारी,दैनिक केसरी,दैनिक पुण्यनगरी,दैनिक लोकमत आदी वर्तमान पत्रात पत्रकार म्हणून काम. अनेक दर्जेदार वृत्त पत्रांतून ललित लेख,कथा सदर, काव्य पुष्प प्रसिध्द,अनेक जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त,एका कवितेची जागतिक विश्व विक्रमी काव्यसंग्रहात नोंद,पुणे आकाशवाणी तसेच सह्याद्री वाहिनी दूरदर्शनवर कवितांचे सादरीकरण प्रसिद्ध. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.कलाम साहेब यांचे अभिनंदन पत्र प्राप्त.

ताज्या बातम्या

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00
Next Post

दुःख घरात ठेवून बाहेर मोकळे पणाने काम करा : ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.