Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking News : उरुळी कांचन ग्रामपंचायतीवर बरखास्तीची टांगती तलवार ? आठवडे व दैनंदिन बाजारातील मक्ता वसुलीचा ठेका देताना ‘कारभाऱ्यांच्या’ नियमबाह्य दृष्टीकोणामुळे सुमारे दोन कोटींचा फटका

जनार्दन दांडगेby जनार्दन दांडगे
Tuesday, 22 August 2023, 20:24

पुणे, ता.२२ : आठवडे व दैनंदिन बाजारातील मक्ता वसुलीचा ठेका देताना ग्रामपंचायतीच्या ‘कारभाऱ्यांनी’ ग्रामपंचायतीचे कोट्यवधींचे उत्पन्न बुडविल्याचे चौकशी अहवालातच सिद्ध झाले. त्यामुळे हवेली तालुक्यातील सर्वात मोठ्या व जिल्ह्यात सर्वात ‘नमुनेबाज कारभार’ म्हणून कायमच चर्चेत असणाऱ्या उरुळी कांचन ग्रामपंचायतीवर बरखास्तीची टांगती तलवार कायम आहे.

उरुळी कांचनचे माजी उपसरपंच सुनिल सुभाष कांचन यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार, मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा परीषदेला निर्देश दिल्याने जिल्हा परीषद बरखास्तीचा निर्णय घेण्याची शक्यता बळावली आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या ‘कारभाऱ्यांनी’ २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांसाठीचा आठवडे व दैनंदिन बाजारातील मक्ता वसुलीचा ठेका नियमबाह्य पद्धतीने दिला. त्यामुळे ग्रामपंचायतीला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या चौकशी समितीने वर्षभरापूर्वीच जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना दिला होता.

मात्र, या अहवालावर कार्यवाही होत नसल्याने उरुळी कांचनचे माजी उपसरपंच सुनिल सुभाष कांचन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने सुनावणीपासून पुढील चार आठवड्यांमध्ये उरुळी कांचन ग्रामपंचायतीवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला दिल्या होत्या. त्याची मुदत पुढील आठवड्यात संपण्याच्या मार्गावर असल्याने जिल्हा परिषदेच्या निर्णयाकडे उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे कारभारी व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. .

 

महाराष्ट्र जलजीवन योजनेच्या माध्यमातून मंजुर झालेल्या ८९ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेच्या साठवणूक तलावातील सुमारे तीन कोटी मुरुम चोरीवरुन उरुळी कांचन ग्रामपंचायत मागील महिनाभरापासून राज्यभरात चर्चेत आली होती. हे थांबत नाही तोच आता गावातीलच आठवडे व दैनंदिन बाजारातील मक्ता वसुलीचा ठेका नियमबाह्य पद्धतीने देऊन ग्रामपंचायतीला कोट्यवधी रुपयांना गंडविल्याचे पुढे आले आहे.

आठवडे व दैनंदिन बाजारातील मक्ता वसुलीचा ठेका देताना कारभाऱ्यांनी तब्बल १ कोटी ९५ लाख २ हजार ५१० रुपयांचे ग्रामपंचायतीचे उत्पन्न बुडवल्याचे जिल्हा परिषदेच्या चौकशी अहवालात पुढे आले आहे. यामुळे उरुळी कांचन ग्रामपंचायतीचा कारभार व कारभारी यांच्याबाबतच्या चर्चेला तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्हातच उधाण आले आहे.

‘कारभाऱ्यांना’ ग्रामविकास अधिकाऱ्यांची भरभक्कम साथ; माजी उपसरपंचांचा आरोप

याबाबत अधिक माहिती देताना माजी उपसरपंच व तक्रारकर्ते सुनिल सुभाष कांचन म्हणाले, ‘उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या विद्यमान ‘कारभाऱ्यांनी’ २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांसाठीचा आठवडे व दैनंदिन बाजारातील मक्ता वसुलीचा ठेका नियमबाह्य पद्धतीने दिला. त्यामुळे ग्रामपंचायतीला तीन वर्षांसाठी मिळून दोन कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. याबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे जिल्हा परिषदेच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत ही बाब समोर आली आहे.

‘कारभाऱ्यांना’ ग्रामविकास अधिकाऱ्यांची भरभक्कम साथ असल्यानेच कारभारी ग्रामपंचायतीला आर्थिक चुना लावण्याचा प्रयत्न करत आहेत. चौकशी अहवालात दोषी आढळूनही ग्रामपंचायतीवर कायदेशीर कारवाई होत नसल्याने कारवाईसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली होती. यात न्यायालयाने तीन आठवड्यापूर्वीच जिल्हा परिषदेला उरुळी कांचन ग्रामपंचायतीवर कारवाई करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली होती. ही मुदत पुढील आठवड्यात संपणार आहे.

चौकशी अहवालात ठेवण्यात आलेला ठपका?

उरुळी कांचन ग्रामपंचायतीने २४ मे २०२२ रोजी मासिक सभेत मंजूर केलेली प्रक्रिया ही यापूर्वी मासिक सभा म्हणजे २३ मे २०२२ च्या सभेच्या इतिवृत्तात ठेवली नाही. सरपंच, उपसरपंच व सदस्य मंडळाने मंजूर केलेली लिलाव प्रक्रिया ग्रामविकास अधिकारी यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करुन नियमबाह्य मंजूर केली आहे. दैनंदिन व आठवडे बाजार लिलाव प्रक्रिया करताना करवसुली, पावतीपुस्तके छापली नसणे, नियम अटी डावलणे, नियंत्रणाची जबाबदारी असणारी नोंदवही नसणे, लिलावाची बोली कमी करुन प्रक्रिया पूर्ण करणे असे नियमबाह्य पद्धतीने कामकाज केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

‘अपना काम बनता, भाड में जाए जनता’

उरळी कांचन ग्रामपंचायतीचे राजकीय समीकरण पाहता ‘अपना काम बनता, भाड में जाए जनता’ या म्हणीला साजेसे काम कारभाऱ्यांनी आठवडे व दैनंदिन बाजारातील मक्ता वसुलीचा ठेका देताना केल्याचे दिसून आले आहे. २०१७-१८ मध्ये ग्रामपंचायतीने ही लिलाव प्रक्रिया ४६ लाख ८० हजार रुपयांमध्ये केली होती. तर २०२२-२३ या वर्षासाठी १८ लाख ३२ हजार इतक्या कमी फरकाने केली.

याशिवाय, २०१८-१९ मध्ये ही ५ कोटी १४ लाख ८० हजार रुपयांमध्ये केली होती. २०२३-२४ मध्ये २० लाख १५ हजार २०० इतकी केली. तर २०१९-२० मध्ये ५६ लाख ६२ हजार ८०० रुपयांमध्ये केलेली प्रक्रिया ३४ लाख ४६ हजार ८० इतक्या कमी दरात करुन ३३ टक्के फरकाने लिलाव कमी केला. या लिलावामुळे ग्रामपंचायतीचे तीन वर्षांमध्ये १ कोटी ९५ लाख इतके उत्पन्न बुडाल्याचे अहवालातून समोर आले आहे.

जनार्दन दांडगे

जनार्दन दांडगे

गेल्या २३ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव आहे. दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २१ वर्षे कार्यरत, नि:पक्षपातीपणे काम, जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या बातम्यांकडे जास्त भर, ६ वर्षापूर्वी भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) या पतसंस्थेचा १६०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी हातखंडा तर १४ वर्षांपूर्वी एका बिल्डरचा ४५० कोटी रुपयांचा बँकिंग घोटाळा उघडकीस आणला, नागरिकांच्या समस्या बातम्यांच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न,जिल्ह्यातील बेकायदा वाळू, जुगार, मटका, दारू आणि अवैध धंदे यांच्यावर कारवाईची मागणी, प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न, राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण यांच्या लेखनात विशेष प्राविण्य. सध्या पुणे प्राईम न्यूज चे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत.

ताज्या बातम्या

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10
Next Post

BJP News : शेतकऱ्यांकडून कांदा खरेदीचा निर्णय घेतल्यामुळे भाजप किसान मोर्चा तर्फे केंद्राचे आभार - भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.