Ajit Pawar : बारामती नगर परिषदेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आले. आठही नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने कार्यकर्त्यांनी मोठा उत्साह साजरा केला. पण दुसरीकडे अजित पवारांसह सत्ताधाऱ्यांची बिनविरोध पॅटर्न ची महाराष्ट्रात चर्चा होत आहे. सत्ताधारी पक्षाचेच उमेदवार बिनविरोध कसे होतात? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.

यावर राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे युवा नेते युगेंद्र पवार यांनी अजित पवार (Ajit Pawar )यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, बिनविरोध करण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांना २०-२० लाख रुपये देऊन अर्ज मागे घ्यायला भाग पाडलं, अशी चर्चा लोकांमध्ये आहे.
बारामती नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने प्रचाराला सुरुवात केला. युगेंद्र पवार हे बारामती नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले. यावेळी त्यांनी यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत अजित पवार यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितलं की, आठ बिनविरोध जागांपैकी चार जागांवर आमचे उमेदवार होते. त्या उमेदवारांना प्रत्येकी २० ते २५ लाख रुपये दिले, अशी चर्चा आहे. आमचे उमेदवार सर्व साधारण घरातील, कष्ट करणारे लोक आहेत; Ajit Pawar ) दहा वर्षातही तेवढे पैसे कमवता येत नाहीत. पैसे देऊन आमची माणसं फोडली गेली. दोन उमेदवार तर नुकतेच आमच्याकडे आलेले, त्यांनी चांगलं काम करू म्हणत संधी मागितली. आम्हाला वाटलं त्यांच्यावर विश्वास ठेवू, ते चांगलं काम करतील. बरेच लोक हे मुद्दाम करण्यासाठी येतात.
युगेंद्र पवार पुढे म्हणाले की, “सत्ताधाऱ्यांनी गेल्या काही वर्षांत पैशांची सवय लावली आहे. आमचे उमेदवार लहान व्यवसायिक आहेत, सामान्य घरातील आहेत. दबाव आला की लोक घाबरतात. Ajit Pawar )सत्ताधाऱ्यांकडे पैसा, सत्ता, संस्था सगळं आहे, त्यामुळे दबाव येणं स्वाभाविक आहे.” त्यांनी पुढे सांगितलं की लोकसभा, विधानसभा आणि आता नगरपालिका निवडणुकीतही हेच चित्र दिसत आहे. सामान्य उमेदवारांवर दबाव आणला जातो.
बारामतीकरांना युगेंद्र पवारांची विनंती
“या वेळेला सामान्य घरातील, उच्चशिक्षित, लोकांमध्ये मिसळून राहणाऱ्यांना संधी द्या.
लोकशाही जिवंत ठेवायची असेल आणि मजबूत विरोधी पक्ष हवा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा द्या,” अशी विनंती त्यांनी केली.







