पुणे: नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या (Rupali Chakankar Resign) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर (Ashok Kharat Case) यांनी अखेर राजीनामा दिला आहे. पक्षातील वाढत्या दबावासह सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय (Rashtrawadi) महत्त्वाचा मानला जात आहे. (Breaking News)

अशोक खरात प्रकरणात गंभीर आरोप समोर आल्यानंतर चाकणकर यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका होत होती. काही नेत्यांकडून त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. या सगळ्या घडामोडींमध्ये त्यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट करत सुरुवातीपासूनच आपण या प्रकरणाशी कोणत्याही प्रकारे संबंधित नसल्याचे सांगितले होते. खरातच्या आर्थिक व्यवहारांशी किंवा गैरकृत्यांशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
राजीनामा देताना त्यांनी म्हटले की, कोणतेही ठोस पुरावे नसताना माध्यमांमधून होत असलेले आरोप वेदनादायक आहेत. मात्र तपास प्रक्रियेत सत्य बाहेर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच या प्रकरणाची चौकशी पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने व्हावी, यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.
पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अंतर्गत हालचाली वेगाने सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.







