गोरखपूर: गोरखपूरमध्ये एका (Viral News) नववधूने लग्नाच्या अवघ्या तीन दिवसांतच घटस्फोटाची मागणी करत आश्चर्यचकित करणारी घटना समोर आणली आहे. कारण इतकेच की, पतीने लग्नाच्या रात्रीच कबूल केले की तो वैवाहिक संबंधांसाठी शारीरिकदृष्ट्या अक्षम आहे. या धक्कादायक खुलाशानंतर वधूने पतीपासून तात्काळ वेगळं होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Breaking News)

मी शारीरिकदृष्ट्या अक्षम असलेल्या पुरुषासोबत…
वधूच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, वराच्या कबुलीनंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि अहवालात तो ‘वडील होऊ शकत नाही’ असे स्पष्ट नमूद झाले. त्यामुळे लग्नात केलेला खर्च आणि दिलेल्या भेटवस्तू परत मिळाव्यात, अशी मागणी वधूपक्षाने वराच्या कुटुंबाकडे केली आहे. वधूने पाठवलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये तिने स्पष्ट लिहिले आहे की, “मी शारीरिकदृष्ट्या अक्षम असलेल्या पुरुषासोबत आयुष्य जगू शकत नाही. हे मला लग्नाच्या रात्रीच समजले.” (Marathi News)
सासरी पोहोचताच बसला धक्का
२५ वर्षीय नवरदेव हा सहजनवा भागातील श्रीमंत शेतकरी कुटुंबातील एकुलता एक मुलगा आहे आणि GIDA मधील औद्योगिक युनिटमध्ये अभियंता म्हणून काम करतो. बेलियापार येथे राहणाऱ्या एका नातेवाईकांमार्फत हे लग्न ठरवण्यात आले होते. २८ नोव्हेंबर रोजी विवाह आणि दुसऱ्या दिवशी ‘विदाई’चा कार्यक्रम झाला. मात्र सासरी पोहोचताच परिस्थिती पूर्ण बदलली. (Marathi Batmya)
नववधू पुन्हा घरी परतली
वधूचे वडील जेव्हा पारंपरिक विधीसाठी सासरी गेले, तेव्हा मुलीने त्यांना खाजगीत या धक्कादायक बाबीची माहिती दिली. त्यानंतर कोणतीही विलंब न करता तिला पालकांच्या घरी परत नेण्यात आले. ३ डिसेंबर रोजी दोन्ही कुटुंबांची बैठक झाली. त्या वेळी वधूपक्षाने वराच्या कुटुंबावर वैद्यकीय स्थिती लपवल्याचा आरोप केला. इतकेच नव्हे तर वधूपक्षाने हा वराचा दुसरा विवाह असून पहिली पत्नीही याच कारणांमुळे एका महिन्यातच घर सोडून गेल्याचा दावा केला.
हेही वाचा: पिस्तुलाचा धाक दाखवून लाखोंची लूट! बारामती MIDC परिसरामध्ये थरार; दोन जणांना अटक
दोन्ही कुटुंबांच्या संमतीने वराला गोरखपूरमधील एका खाजगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. अहवालात तो शारीरिकदृष्ट्या अक्षम असल्याचे नमूद झाल्यानंतर वाद आणखी तीव्र झाला. वराच्या वडिलांनी सुरुवातीला हा निष्कर्ष मान्य करण्यास नकार दिला, त्यामुळे वधूपक्षाने पोलिसांची मदत घेतली.
पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तोडगा निघाला. वराच्या कुटुंबाने ७ लाख रुपये लग्नाचा खर्च आणि सर्व भेटवस्तू एका महिन्याच्या आत परत करण्याचे लेखी मान्य केले. सहजनवा पोलिस ठाण्याचे एसएचओ महेश चौबे यांनी सांगितले की, दोन्ही कुटुंबे परस्पर सहमतीने हे प्रकरण सोडवत आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आहे.






