पुणे : गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर यश आलं.केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.या घडामोडीमुळे.नागपूर दौरा रद्द करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.. या दौऱ्याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत

समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक महत्त्वपूर्ण व तातडीची बैठक होणार आहे. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची बातमी समोर येताच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सोशल मीडियावर सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एका बाजूला केंद्रातील मंत्र्याचा राजीनामा आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री फडणवीस यांचा तातडीचा दिल्ली दौरा, यामुळे राज्य आणि केंद्र पातळीवर मोठ्या राजकीय हालचालींची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीत नक्की कोणत्या विषयांवर चर्चा होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

NEET परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थ्यांच्या सुरु असलेल्या सततच्या आंदोलनामुळे आणि वाढत्या दबावामुळे अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आंदोलक व विद्यार्थ्यांनी जंतर-मंतरवर एकत्र येत या निर्णयाचे स्वागत केले आणि मोठा विजय साजरा केला. या लढ्याला मिळालेल्या यशानंतर अभिजीत दिपके यांनी आनंद व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले असल्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.







