कोल्हापूर : महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकचे लक्ष लागून राहिलेल्या नांदणी येथील स्वस्तीश्री जिनसेन भट्टाचार्य मठाची ‘माधुरी’ ही हत्तीण उपचारांनंतर पुन्हा एकदा आपल्या घरी, म्हणजेच कोल्हापुरात परतली आहे. तिची सुखरूप घरवापसी झाल्यामुळे संपूर्ण शहरात जल्लोषात तिचे स्वागत करण्यात आले.

माधुरीच्या आरोग्याविषयी चिंता निर्माण झाल्यानंतर 2025 मध्ये तिला गुजरातमधील जामनगर येथील ‘वंतारा’ पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आले होते. तिथे तिचे सांधे आणि इतर आरोग्यविषयक समस्यांवर अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या साहाय्याने विशेष उपचार करण्यात आले. वंनताराच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने तिची योग्य देखभाल घेत पुनर्वसन पूर्ण केले, ज्यामुळे तिच्या आरोग्यात मोठी सुधारणा झाली आहे.

गुजरात राज्यातील जामनगर येथील ‘वनतारा ‘हत्ती पुनर्वसन केंद्रातुन गुरुवारी सायकांळी 5.15 वाजता माधुरीची रवानगी केली.’
वंनतारा टीमसह तब्बल 1160किमीचा 32 तासाचा प्रवास पूर्ण करत माधुरी रात्री नांदणी मठात दाखल झाली.

माधुरी कोल्हापुरात परतल्याचे वृत्त समोर येताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (ट्विटर) वर नागरिकांनी आणि नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. वंनतारा टीमची मेहनत आणि प्राण्यांप्रती असलेली सेवा पाहून अनेकांनी अनंत अंबानी यांचे मनापासून आभार मानले आहेत.”माधुरीच्या आरोग्याला प्राधान्य देऊन तिची योग्य काळजी घेतल्याबद्दल अनंत अंबानी आणि वंतारा टीम खरोखरच कौतुकास पात्र आहे.”
“उपचारानंतर माधुरी अत्यंत आनंदी दिसत असून तिला पुन्हा कोल्हापुरात पाहणे हा भावूक क्षण आहे.”दीर्घकाळ चाललेल्या या उपचारांनंतर माधुरी पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी परतल्याने कोल्हापूरकरांशी असलेले तिचे भावनिक नाते अधिक घट्ट झाले असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.







