ST Bus News : मुंबई, : राज्याची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीचा प्रवास आता अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि प्रवासाभिमुख होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (ST) प्रवाशांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी ‘आपली बस, आपली सेवा’ हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या उपक्रमाची घोषणा केली असून, १ मे २०२६ (महाराष्ट्र दिन) पासून हे अभियान राज्यभर राबवले जाणार आहे. ST Bus News

बसेसची संख्या वाढूनही प्रवासी संख्या आणि महसुलात अपेक्षित वाढ होत नसल्याने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. या अभियानांतर्गत चालक आणि वाहक यांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. बस सुटण्यापूर्वी स्वच्छता करणे आता अनिवार्य असेल. कर्मचारी वेळेवर उपस्थित राहणे आणि प्रवाशांशी आदराने वागणे यावर भर दिला जाईल. प्रवासादरम्यान चालकाने प्रवाशांना मार्गाची आणि स्थानकांची माहिती देऊन संवाद साधणे अपेक्षित आहे. ST Bus News

एसटी प्रवासात अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे बस रद्द होते किंवा प्रवाशांना ताटकळत राहावे लागते. आता अशा परिस्थितीत प्रवाशांना तातडीने पर्यायी बस उपलब्ध करून देण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. प्रवाशांचा खोळंबा टाळण्यासाठी प्रशासनाने ही नवीन नियमावली तयार केली आहे. केवळ बसेसच नाही, तर बसस्थानकांची स्वच्छता आणि सुरक्षा राखण्याची जबाबदारी आता संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे. स्थानकांवर प्रवाशांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावरही या अभियानात प्राधान्य दिले जाणार आहे. ST Bus News

एसटी आणि प्रवाशांचे नाते होणार दृढ
“हे केवळ एक सेवा सुधारणा अभियान नसून, एसटी आणि सर्वसामान्य प्रवासी यांच्यातील नाते अधिक घट्ट करण्याचा हा प्रयत्न आहे,” असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे एसटीचा प्रवास अधिक सुखद आणि सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ST Bus News







