संदिप टूले
पुणे : पुणे पाटबंधारे मंडळाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत काल पार पडली,या बैठकीला दौंडचे आमदार राहुल कुल हे उपस्थित होते.यावेळी राहुल कुल यांनी बैठकीदरम्यान ३ मागण्या प्रखरतेने केल्या आहेत.
या मागण्यांमध्ये खडकवासला कालव्यातून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी दोन उन्हाळी आवर्तने मिळवीत अशी मागणी केली. धरणसाठ्यात पाणी शिल्लक असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करून शहर व ग्रामीण भागाचा समन्वय साधत, कालव्यातून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पहिले आवर्तन ५० दिवसांचे व ५ दिवसांच्या फरकाने दुसरे आवर्तन ४५ दिवसांचे करावे तर दुसऱ्या मागणीमध्ये आवर्तन देताना टेल टू हेड सर्वाना पाणी मिळेल यासाठी खबरदारी घ्यावी, शेतकरी व नागरिकांना पाणी टंचाई जाणवणार नाही यासाठी योग्य नियोजन व खबरदारी प्रशासनाने घ्यावी.आणि तिसरी मागणी पुणे महानगरपालिका हद्दीतील पिण्याच्या पाण्याची वितरण व्यवस्था सुधारावी यासाठी मागणी केली.
या बैठकीदरम्यान खडकवासला, पवना, चासकमान, भामा आसखेड, नीरा डावा व उजवा कालवा यांमधील पाणीसाठा आणि पाणी पुरवठा नियोजनाच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी पुणे जिह्यातील मंत्री, राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त व जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.