मुंबई: अनेक (Bigg Boss 19 Winner) आठवड्यांच्या संघर्षानंतर अभिनेता गौरव खन्ना याने ‘बिग बॉस 19’ ची ट्रॉफी जिंकली आहे. गौरवच्या शांत आणि संयमी खेळाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. गौरव खन्नाला आकर्षक ट्रॉफीसह तब्बल 50 लाख इतकी मोठी बक्षीस रक्कम देण्यात आली आहे. गौरवने शोमध्ये सतत आपली पकड मजबूत ठेवत शांतपणे खेळत आणि आपली भूमिका स्पष्टपणे मांडत इतरांना मागे टाकले.

अभिनेता गौरव खन्नासाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. ‘बिग बॉस 19’ ची ट्रॉफी जिंकून गौरवने अनेकांच्या मनात छाप सोडली आहे. याच वर्षी त्याने ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया’ चा खिताबही जिंकला होता. एकाच वर्षात दोन मोठे रिअॅलिटी शो त्याने जिंकले आहे.
अंतिम टप्प्यातील हा प्रवास गौरव खन्ना, फरहाना भट्ट, प्रणीत मोरे, अमाल मलिक आणि तान्या मित्तल या टॉप 5 खेळाडूंनी पूर्ण केला. विजेतेपदाच्या जवळ असताना वोटिंगचा आकडा बदलला आणि प्रणित मोरे हा तिसऱ्या क्रमांकावर आला. यामुळे, स्पर्धेत गौरव आणि फरहाना त्यांच्यात विजेतेपदासाठी थेट चुरशीची लढत झाली.
टीव्ही मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारून चाहत्यांच्या मनात घर करणारे अभिनेते गौरव खन्ना यांनी ‘बिग बॉस 19’ मध्ये ‘टीव्ही सुपरस्टार’ म्हणून प्रवेश केला होता. विशेषतः ‘अनुपमा’ सारख्या लोकप्रिय शोमुळे गौरव नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. 24 ऑगस्ट 2025 रोजी ‘बिग बॉस 19’ या रिअॅलिटी शोची सुरुवात झाली. गौरव खन्ना यांनी एकूण 17 स्पर्धकांमध्ये सामील होऊन सुरुवातीपासूनच आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.






