Mumbai-Ahmedabad Road पालघर, ता. 18 : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सायंकाळी भीषण अपघात घडून संपूर्ण परिसर हादरला. डहाणू तालुक्यातील धानिवरी परिसरात साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या आयशर ट्रकला कंटेनरने जोरदार धडक दिल्याने भीषण दुर्घटना घडली. या अपघातात दुचाकीसह अनेक जण चिरडले गेले असून, प्राथमिक माहितीनुसार १२ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३० ते ३५ जण गंभीर जखमी झाले आहेत. Mumbai-Ahmedabad Road
मिळालेल्या माहितीनुसार, डहाणू तालुक्यातील बापूगाव येथून साखरपुड्यासाठी वऱ्हाड धानिवरीकडे निघाले होते. वऱ्हाडाने भरलेला आयशर ट्रक नवरीच्या घराजवळ पोहोचत असतानाच हा भीषण अपघात झाला. ट्रकमध्ये ४० हून अधिक नागरिक प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. Mumbai-Ahmedabad Road
दरम्यान, महामार्गावरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर वाहनाने आयशर ट्रकला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कंटेनरचा पुढील भाग वेगळा होऊन थेट ट्रकवर कोसळला. यावेळी जवळून जाणारी एक दुचाकीही कंटेनरखाली चिरडली गेली. अपघातात दुचाकीवरील दोघांसह अनेकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. Mumbai-Ahmedabad Road
घटनेनंतर परिसरात एकच आक्रोश पसरला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले. अपघातातील जखमींना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमींना धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालय तसेच गुजरातमधील विविध रुग्णालयांत हलविण्यात आले आहे. Mumbai-Ahmedabad Road
अपघातानंतर कासा रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली असून, जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलिस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.







