Jalgav district politics : काहीही झालं तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार नाही असं म्हणणारे जेष्ठ नेते आणि शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणारे अरुण गुजराथी यांनी यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (ncp) प्रवेश केला आहे. गेल्या कित्तेक दिवसांपासून अरुण गुजराथी हे मी येत्या दोन महिन्यांपूर्वी राजकारणातून संन्यास घेणारं असल्याचे सांगत होते. त्यांनी सांगितले होते की, ते फक्त मार्गदर्शन करणार असून पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार नाही. पण अखेर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचं घड्याळ हातात घातलं आहे. त्यामुळे एकचं खळबळ उडाली आहे. (Jalgav district politics)

अरुण गुजराथी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
मात्र, दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात मंत्री माणिकराव कोकाटे (manikrao kokate) यांनी याची माहिती दिली की अरुण गुजराथी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यानंतर मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या नेतृत्वात झालेल्या प्रवेश सोहळ्यात अरुण गुजराथी (arun gujrathi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
अरुण गुजराथी हे शरद पवार (sharad pawar) यांचे विश्वासू आणि निष्ठावान नेते मानले जातात. त्यांच्या या निर्णयाने जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे. २०१९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पराभवाचा धक्का बसल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी पक्ष सोडला होता. अरुण गुजराथी यांचे पक्ष सोडणे हा एक मोठा धक्का मानला जात होता.
सप्टेंबर महिन्यात शरद पवार (sharad pawar) यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात बैठक पार पडली होती, त्यात अरुण गुजराथी (arun gujrathi) अनुपस्थित होते, आणि तेव्हापासून त्यांच्या पक्ष बदलण्याची चर्चा सुरू झाली होती. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी राजकारणातून हळूहळू बाहेर पडण्याचे संकेत दिले होते, मात्र आता त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
”शरद पवार साहेबांनी मला खूप दिलं”
शरद पवार साहेबांनी मला खूप दिले, मात्र माझे वय झाले आहे. त्यामुळे हळूहळू राजकारणातून बाहेर पडणार आहे. कार्यकर्ते काय तो निर्णय घेतील, असं दोन महिन्यांपूर्वी अरुण गुजराथी म्हणाले होते. अनेक वर्षांपासून सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना मी मार्गदर्शन करत राहीन, पण पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाईल असं होणारं नाही असं ते म्हणाले होते.
अरुण गुजराथी यांचा निर्णय आणि त्यांचा पक्ष बदलणारा पवित्रा, हा जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आगामी भवितव्यावर मोठा परिणाम करेल, असे मानले जात आहे.







