Tamhini Ghat Accident : कोकण पर्यटनासाठी निघालेल्या पुण्यातील सहा तरुणांचा ताम्हिणी घाटात झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री उशिरा त्यांची थार कार सुमारे 500 फूट खोल दरीत कोसळली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. (accident latest news)

मृतांची नावे समोर
मृतांमध्ये शहाजी चव्हाण ( वय 22 वर्ष), पुनित सुधारक शेट्टी (वय 20 वर्ष), साहील बोटे (वय 24 वर्ष), श्री महादेव कोळी (वय18 वर्ष), ओंकार कोळी (18 वर्ष) आणि शिवा माने (19 वर्ष) यांचा समावेश असून सर्वजण पुण्यातील उत्तमनगर परिसरातील रहिवासी होते.
हेही वाचा: गर्लफ्रेंडला मंदिरात भेटायला बोलावलं, मित्रांचा रूमबाहेर पहारा अन्… नराधमान केला बलात्कार
हरवल्याची तक्रार आणि शोधमोहीम
सोमवारी रात्री 11.30 वाजता हा सहा मित्रांचा गट थार (एमएच–12 YN 8004) घेऊन कोकणाकडे निघाला होता. मंगळवारी दिवसभर त्यांच्याशी संपर्क न आल्याने पालकांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर लगेच शोधमोहीम सुरू करण्यात आली.
पहा फोटो:

कोकण पर्यटनासाठी निघालेल्या पुण्यातील सहा तरुणांचा ताम्हिणी घाटात झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे.
ड्रोनच्या मदतीने शोध घेत असताना थार कार दरीत कोसळलेली आढळली. घटनास्थळी गाडीचा चक्काचूर झालेला दिसून आला. या दुर्दैवी घटनेने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.







