दिल्ली: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) हत्याप्रकरणात मुख्य आरोपी मानल्या जाणाऱ्या वाल्मिक कराड (Walmik Karad) याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. सुप्रीम कोर्ट ने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या (Beed News) समोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हस्तक्षेप (Massajog News) करण्यास नकार दिला. मात्र, खटल्याची सुनावणी दीर्घकाळ पुढे सरकली नाही तर वर्षभरानंतर पुन्हा जामिनासाठी दाद मागता येईल, अशी शक्यता खुली ठेवण्यात आली आहे. (Dhananjay Munde)

यापूर्वी औरंगाबाद खंडपीठ तसेच बीड जिल्हा न्यायालयानेही कराडचा जामीन आणि दोषमुक्ती अर्ज फेटाळला होता. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. सुनावणीपूर्वी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कॅव्हेट दाखल करून कुटुंबाची बाजू मांडण्याची तयारी दर्शवली होती.
9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. तपासादरम्यान अनेक आरोपींना अटक झाली असली, तरी कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. तो गावी तीन वेळा येऊन गेला, असा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे. कुटुंबाला धोका असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, खंडणीच्या वादातून ही हत्या झाल्याचा उल्लेख आहे. खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही बाबींचा तपास एकत्रितपणे सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यामुळे आरोपींच्या सुटकेचा मार्ग सध्या बंद झाला असला, तरी मुख्य खटल्याची सुनावणी गतीमान होणे हीच आता पीडित कुटुंबाची अपेक्षा आहे.







