मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ajit Pawar) नेते आणि माजी मंत्री (Manikrao Kokate Resign) माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाकडून मोठा (Manikrao Kokate Arrest Warrant) दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने (Manikrao Kokate Controversy) माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला (Dhananjay Munde) स्थगिती दिली असून, या याचिकेवरील अंतिम सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्यांना 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात (Sana Malik) आला आहे. कोकाटे यांना केवळ 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे शिक्षेला स्थगिती देण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र एकीकडे अटकेची टांगती तलवार दूर झाली असली तरी दुसरीकडे त्यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता कायम आहे.( Maharashtra Politics)

राष्ट्रवादीत घडामोडींना वेग
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या रिक्त होणाऱ्या मंत्रीपदावर सध्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपदावर बढती देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच इंद्रनील नाईक यांचे राज्यमंत्रीपद मुंबईतील आमदार सना मलिक यांना देण्याचा विचार पक्षाकडून सुरू असल्याची माहिती आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता असल्याचे पक्षातील विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. (Latest Breaking News)
धनंजय मुंडेंना डावललं जाणार
दरम्यान, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटात मंत्रीपदासाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे, अनिल भाईदास पाटील, संजय बनसोडे यांच्यासह माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आणि मावळचे आमदार सुनील शेळके हेही मंत्रीपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. मात्र काही वादग्रस्त प्रकरणांमुळे धनंजय मुंडे यांच्या नावावर अडथळे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
40 एकरचा मलिदा अन् लक्झरी लाइफ! शीतल तेजवानीच्या घराची झाडाझडती; पोलिसांच्या हाती ‘बडे’ पुरावे
अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक
या परिस्थितीत पक्षाचे लक्ष इंद्रनील नाईक यांच्याकडे वळले आहे. विदर्भातून राष्ट्रवादीचा केवळ एकच राज्यमंत्री असल्याने त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन विदर्भातील जनाधार मजबूत करण्याचा पक्षाचा विचार आहे. इंद्रनील नाईक सध्या उद्योग, मृद व जलसंधारण, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण आणि पर्यटन अशा खात्यांचा कारभार पाहत आहेत. तर सना मलिक यांच्या माध्यमातून मुस्लिम, महिला आणि तरुण वर्गाला प्रतिनिधित्व देण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर फेब्रुवारी 2026 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ बदल होण्याची दाट शक्यता आहे.







