Purandar News पुणे, ता. 30 : बहुप्रतिक्षित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला अखेर वेग आला असून, या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सात गावांतील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा समोर आली आहे. राज्य सरकारकडून भूसंपादनासाठी प्रति एकर १ कोटी ते १.५ कोटी रुपयांपर्यंत मोबदला देण्याची शक्यता व्यक्त होत असून, हा निर्णय शेतकऱ्यांसाठी आर्थिक परिवर्तनाचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. Purandar News

सरकारच्या प्रस्तावित पॅकेजनुसार, शेतकऱ्यांना रेडीरेकनर दराच्या चारपट रोख भरपाईसोबतच १० टक्के विकसित जमीन परत दिली जाणार आहे. ‘लँड पूलिंग’ मॉडेलमुळे भविष्यात या जमिनींची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय एरोसिटी प्रकल्पात टीडीआरचा लाभ मिळणार असल्याने हे पॅकेज राज्यातील सर्वात आकर्षक मानले जात आहे. Purandar News
प्रकल्पग्रस्त कुटुंबांच्या मुलांना रोजगारात १०० टक्के प्राधान्य देण्याची हमीही शासनाने दिली आहे. विमानतळासोबत लॉजिस्टिक्स, हॉटेल, वाहतूक आणि सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असल्याने पुरंदर तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
या प्रकल्पासाठी उदाचीवाडी, एखतपूर, कुंभारवळण, खानवडी, मुंजवडी, पारगाव आणि वनपुरी या सात गावांतील सुमारे ३ हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. भूसंपादनाचा खर्च आता सुमारे ६ हजार कोटींवर पोहोचला असून, सरकारची मोठी गुंतवणूक या प्रकल्पात दिसून येत आहे. Purandar News
दरम्यान, प्रस्तावित विमानतळ आणि रिंगरोडमुळे परिसरातील जमिनींचे दर झपाट्याने वाढले आहेत. शेतीप्रधान असलेला हा भाग आता औद्योगिक व व्यावसायिक विकासाच्या उंबरठ्यावर उभा असून, पुरंदर विमानतळ प्रकल्प हा संपूर्ण परिसराच्या आर्थिक बदलाचा केंद्रबिंदू ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. Purandar News






