नवी दिल्ली: नवी दिल्ली येथील रामलीला मैदानात काँग्रेस पक्षाने ‘मत चोरी’च्या आरोपांविरोधात मोठी रॅली आयोजित केली आहे. मात्र, काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर्स घेऊन “मोदी अब तेरी कब्र खुदेगी” अशा घोषणा रॅली सुरु होण्यापूर्वी दिल्या, ज्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. पात्रा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल वाईट वक्तव्ये केली गेली आहेत, तेव्हा देशातील जनतेने काँग्रेसला धडा शिकवला आहे. ही केवळ काँग्रेसच्या नेत्यांची अहंकारी भाषा आहे, असे ते म्हणाले. या घटनेनंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे.

पाहा व्हिडीओ:
“MODI TERI KABRA KHUDEGI”.
Congress workers ahead of the rally in Ramlila Maidan shout slogans Giving death threats to PM @narendramodi !
Congress has become a Muslim League Maovadi Party under Rahul Gandhi backed by Urban Naxals!
People of India will respond to this threat by… pic.twitter.com/TI8vjAtTkm
— Pradeep Bhandari(प्रदीप भंडारी)🇮🇳 (@pradip103) December 14, 2025
‘व्होट चोरी’ बद्दल संसदेमध्ये आधीच चर्चा झाली आहे. परंतु राहुल गांधींच्या या विषयावरची तोकडी माहिती स्पष्टपणे सभागृहात दिसली. मतदारसंघात वोट चोरी झाल्यास काँग्रेसने थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी, विनाकारण बदनामी करू नये, असे पात्रा म्हणाले.
पंतप्रधान मोदींबाबत ‘कब्र’सारख्या घोषणा दिल्या जात असतील, तर काँग्रेसने आपला इतिहास विसरू नये. गृहमंत्र्यांनी जेव्हा घुसखोरीचा विषय सभागृहात काढला, तेव्हा काँग्रेसने काही उत्तर दिले नाही, असा आरोपही पात्रा यांनी केला. आजची ही रॅली घुसखोरांना वाचवण्यासाठीच काढली जात आहे. काँग्रेस पक्ष अजून किती दिवस फक्त मतांसाठी तुष्टीकरणाचे राजकारण करणार आहे, असा सवाल संबित पात्रा यांनी यावेळी केला.







