पुणे: पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या (Khandala Accident) भरधाव मालवाहू ट्रकचा खंडाळा (Pune Accident) बोरघाटात भीषण अपघात झाला आहे. ट्रक चालकाचे (Pune News) नियंत्रण सुटल्याने मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वेवरील अमृतांजन ब्रिजला ट्रकची जोरदार धडक बसली. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला असून घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. (Breaking News)

ट्रक भरधाव वेगात
सदर मालवाहू ट्रक पुण्याहून मुंबईकडे सिमेंटचे बॉक्स घेऊन जात होता. खंडाळा बोरघाटात उताराच्या मार्गावर असताना ट्रक भरधाव वेगात होता, अशी प्राथमिक माहिती आहे. अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट अमृतांजन ब्रिजच्या संरक्षक भिंतीवर आदळला. धडक इतकी जोरदार होती की ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. या भीषण अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला.
वाहतूक ठप्प
अपघातानंतर ट्रकमधील सिमेंटचे बॉक्स रस्त्यावर विखुरले गेले होते. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच खंडाळा बोरघाट पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रक आणि रस्त्यावर पडलेला माल बाजूला काढण्याचे काम सुरू केले. काही वेळानंतर हळूहळू वाहतूक सुरळीत करण्यात आली. मृत चालकाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
राज्यात अपघातांच्या प्रमाणात वाढ
दरम्यान, राज्यात अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक ठिकाणी या अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. कालच बीड–लातूर राष्ट्रीय महामार्गावर अंबाजोगाईजवळ बीड आणि लातूर जिल्ह्याच्या सीमेवर स्विफ्ट डिझायर आणि स्कॉर्पिओ यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत स्विफ्ट डिझायरमधील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर स्कॉर्पिओमधील 2 महिलांसह 4 जण गंभीर जखमी झाले होते.







