मुंबई: संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी, द डायमंड बाजार’ या वेब सिरीजमध्ये दमदार अभिनयाने डिजिटल क्षेत्रात पदार्पण (Digital Debut) करणारी अभिनेत्री मनीषा कोइराला (Manisha Koirala) सध्या एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आली आहे. जीवनातील सत्य आणि मृत्यूचे गूढ समजून घेण्यासाठी तिने आता आध्यात्मिक मार्गाचा अवलंब केला आहे. तिने नुकताच तिबेटियन बौद्ध शिक्षक आणि लेखक योंगे मिंग्युर रिनपोछे यांच्यासोबत जीवनातील सत्य आणि मृत्यूचे गूढ या विषयावर संवाद साधला आहे.

‘बार्डो’च्या रहस्याची उत्सुकता
मनीषा कोइरालाला प्रामुख्याने ‘बार्डो’ या संकल्पनेबद्दल जाणून घ्यायचे होते. ‘बार्डो’ म्हणजे तिबेटियन बौद्ध धर्मात मृत्यू आणि पुनर्जन्माच्या मधली अवस्था असते. मृत्यू आणि पुनर्जन्म या दरम्यानचा जीवनाचा खरा अर्थ काय आहे, हे समजून घेण्याचा तिचा प्रयत्न आहे. मनीषा कोइरालाने तिचा अनुभव सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
‘तुम्ही जसे जगलात, तसेच मराल’
अभिनेत्री मनीषा कोइरालाने तिचे आध्यात्मिक अनुभव आणि तिबेटियन बौद्ध शिक्षकांसोबतचे काही छायाचित्रे (Photos) सोशल मीडियावर (Social Media) शेयर केले असून तिने कॅप्शनमध्ये व्यक्त केले आहे की, जीवनात तिला नेहमीच मृत्यूच्या रहस्याचा अभ्यास करायचा होता. तिचा ठाम विश्वास आहे की एकदा का या विषयाचे खरे ज्ञान प्राप्त झाले, की तिच्या मनातील मृत्यूची भीती निश्चितपणे दूर होईल.
तिच्या या जिज्ञासेमुळेच ती ‘द तिब्बती बुक ऑफ लिविंग एंड डाइंग’ या प्रसिद्ध पुस्तकापर्यंत पोहोचली. या पुस्तकातील एका विचाराने तिला खूप प्रभावित केले: “तुमचे जीवन जसे असेल, तुमचा मृत्यूही तसाच असेल…” या वाक्याने मनीषाच्या विचारांना एक नवी दिशा मिळाली.
गुरू रिनपोछेंच्या ज्ञानाची प्रशंसा
अभिनेत्री मनीषा कोइराला यांनी योंगे मिंग्युर रिनपोछे या विख्यात तिबेटियन बौद्ध शिक्षकांना भेटून आपल्या आध्यात्मिक शोधाबद्दल गहन चर्चा केली आहे. मनीषाच्या मते, रिनपोछे यांच्या मार्गदर्शनामुळे तिला जीवनाचे अस्सल उद्दिष्ट काय आहे आणि मृत्यू व पुनर्जन्म यांमधील संक्रमण अवस्थेत (State between Death and Rebirth) काय घडते, याविषयी स्पष्ट माहिती मिळाली आहे. योंगे मिंग्युर रिनपोछे हे खरोखरच ‘छान गुरू’ आहेत. त्या म्हणतात, “त्यांचे आनंदी स्वभाव, त्यांची नम्रता आणि त्यांच्याकडे असलेले अतिगहन ज्ञान हे सर्वसामान्य माणसालाही सहज समजेल अशा सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने ते शिकवतात.” मनीषाच्या मते, रिनपोछे यांचे शिक्षण केवळ शाब्दिक उपदेशावर आधारित नसून, ते प्रत्यक्ष अनुभवातून शिकवतात.







