सातारा: सातारा जिल्हा रुग्णालयातील एका अत्यंत (Shocking News) संवेदनशील आणि धक्कादायक प्रकरणाने आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. उच्च न्यायालयाच्या (Satara News) आदेशानुसार गर्भपाताच्या प्रक्रियेदरम्यान जिवंत जन्मलेल्या बाळाला 12 तास उपाशी ठेवून मृत्यू ओढवून दिल्याचा आरोप मृत बाळाच्या आईने केला आहे. या प्रकरणी तिने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. (Latest Marathi News)

आईच्या आरोपांनुसार, बाळ जन्मल्यानंतर त्याला दूध पाजण्यासाठी तिने वारंवार विनंती केली. मात्र “कोर्टाचा आदेश आहे” असे सांगत डॉक्टरांनी तिला थांबवले. “मी विनवणी करत होते, पण कोणतीही दखल घेतली गेली नाही. माझ्या लेकराला उपाशी ठेवून मारण्यात आले,” असा गंभीर आरोप तिने केला आहे. या घटनेमुळे केवळ वैद्यकीय प्रक्रियेवरच नाही, तर मानवी संवेदनशीलतेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणात संबंधित डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनावर गुन्हा दाखल करावा, तसेच मानसिक धक्क्यामुळे 10 लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. दुसरीकडे, जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले असून, “अशा प्रकारची घटना घडलेली नाही,” असे स्पष्ट केले आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 मार्च रोजी होणार असून, त्यातून या आरोपांचे सत्य आणि जबाबदारी निश्चित होण्याची अपेक्षा आहे.







