अमरावती: राज्यातील महापालिका निवडणुकांच्या (Asaduddin Owaisee) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. विविध पक्षांचे नेते जाहीर (Navneet Rana) सभांमधून एकमेकांवर जोरदार टीका करत असून (MIM) एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी हेही महाराष्ट्रातील (Akola News) प्रचारात सक्रिय झाले आहेत. ओवैसी यांनी (Amravati News) अकोला आणि अमरावती येथे जाहीर सभा घेतल्या. या सभांमध्ये बोलताना त्यांनी भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार केला. (Latest Marathi News)

नवनीत राणा यांनी यापूर्वी एका वक्तव्यात, एका मौलानाकडे चार बायका आणि 19 मुले असल्याचा उल्लेख करत हिंदूंनी किमान चार मुले जन्माला घालावीत, असे विधान केले होते. या वक्तव्यावर अमरावतीतील सभेत प्रतिक्रिया देताना ओवैसी म्हणाले की, तुम्ही चार नाही तर आठ मुले करा, आम्हाला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. अशा प्रकारच्या वक्तव्यांमधून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
यावेळी बोलताना ओवैसी यांनी राज्यातील राजकीय समीकरणांवरही भाष्य केले. अमरावती आणि औरंगाबादमध्ये काहीच होणार नाही, तर बडनेरामध्ये आपल्या सगळ्या जागा निवडून आणल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. तसेच काही जण अजित पवार आपले काम करतील असे म्हणतात, पण आता घड्याळाची वेळ गेली असून पतंगाची वेळ आली आहे, असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावरही टीका केली.
ओवैसी म्हणाले की, ही वेळ जागं होण्याची आहे. मताचा योग्य वापर करून आपल्या ताकदीवर सत्ता आणली पाहिजे. आम्हाला भाजपची बी टीम म्हटले जाते, पण मी अल्लाचा पुतळा आहे, असे विधानही त्यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरही प्रश्न उपस्थित केले.
यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत, आगामी निवडणुकीत आमच्या मतांनी आमचे लोक निवडून देऊ, असा दावा केला. तसेच 12 तारखेला प्रचारासाठी पुन्हा येणार असल्याचेही ओवैसी यांनी जाहीर केले.







