Tamhini ghat Accident: पुणे – कोकण मार्गावरील ताम्हिणी घाटात एक भीषण अपघात घडला. या अपघातात पर्यटकांची नवीकोरी कार थेट 500 फूट खोल दरीत कोसळली. आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या कारमध्ये 6 जण प्रवास करत होते. त्यापैकी 2 जण अद्याप बेपत्ता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी रात्री झाला होता. मात्र, दोन दिवस काही संपर्क न झाल्यामुळे नातेवाईकांनी शोध घेतला आणि आज सकाळी ही दुर्घटना उघडकीस आली. बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या मोबाइल लोकेशनवरून ताम्हिणी घाट परिसरात त्यांच्या हालचालींचा मागोवा मिळाला आणि तत्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली.
हेही वाचा- मनपा निवडणुकीआधी 32 गावांना मोठा दिलासा! अजित पवारांच्या बैठकीनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय…
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असावा असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. कार थेट 500 फूट खोल दरीत कोसळली. घटनास्थळी पोहोचलेल्या सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था आणि रेस्क्यू टीमने तातडीने शोध आणि बचावकार्य सुरू केले. ड्रोन सर्व्हे , दोरखंड, क्रेन आणि रेस्क्यू उपकरणांच्या मदतीने मृतदेह वर काढण्याचे काम सुरू आहे.
माणगाव पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करण्यात आला आहे. वाहनात आणखी कुणी होते का, याचा तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी सांगितले.
मृतांची ओळख पटली
पोलीस तपासात या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. अपघातातील सर्व तरुण हे पुणे शहरातील उत्तमनगर येथील रहिवासी होते. साहील साधू गोटे (24), शिवा अरुण माने (19), ओंकार सुनील कोळी (18), महादेव कोळी (18), प्रथम रावजी चव्हाण (24), पुनीत सुधाकर शेट्टी (20) अशी अपघातातील मृत तरुणांची ओळख समोर आली आहे.
हेही वाचा- इंदापूर मध्ये बसच्या चाकाखाली जाण्यापासून मोटारसायकलस्वार थोडक्यात बचावला…. पहा Video






