पुणे: महाराष्ट्र महानगरपालिका (Pune News) निवडणुकांच्या निकालांनी राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. ज्या शहराने राज ठाकरेंच्या मनसेला एकेकाळी भरभरून प्रेम दिले, त्याच पुण्याने यंदा मनसेच्या पदरी ‘शून्य’ यश टाकले आहे. 29 पैकी 22 महापालिकांत खातेही न उघडता आल्याने राज ठाकरे प्रचंड आक्रमक झाले असून, पुण्यात त्यांनी थेट नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची ‘शाळा’ घेतली आहे.

एकेकाळी पुणे महानगरपालिकेत मनसेचे तब्बल 29 नगरसेवक होते. पुण्यात मनसे हा निर्णायक पक्ष मानला जात असे. मात्र, २०२६ च्या निवडणुकीत ही आकडेवारी शून्यावर आली. इतकेच नाही तर शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासारख्या मोठ्या चेहऱ्यालाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. नाशिकमध्येही पक्षाची अवस्था बिकट असून तिथे अवघी एक जागा निवडून आली आहे.
पुण्यात काल झालेल्या बैठकीत राज ठाकरेंनी पराभूत उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले. “निवडणुकीपूर्वी सांगितलेल्या गोष्टींची अंमलबजावणी का झाली नाही?” असा थेट सवाल त्यांनी नेत्यांना विचारला. कार्यकर्त्यांचा जनसंपर्क कमी पडणे आणि पक्ष बांधणीतील मरगळ या पराभवाला कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. नेत्यांच्या सुस्त कारभारामुळे मुंबईतही ‘ठाकरे ब्रँड’ची जादू ओसरली की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राज ठाकरेंनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला
-
आता दर आठवड्याला राज ठाकरे स्वतः पुण्यातील कामाचा आढावा घेतील. मुंबईत बसून नव्हे, तर स्वतः हजेरी घेऊन नेत्यांच्या कामाचा हिशोब घेतला जाईल. साहेबांच्या’ दर आठवड्याच्या आढावा बैठकीमुळे आता सुस्त बसलेल्या पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
-
पराभवातून बाहेर पडून पुण्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
दरम्यान, राज ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे नेमका काय बदल होणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






